मागे वळून पाहताना- समाजसेवेतच आनंद

मागे वळून पाहताना- समाजसेवेतच आनंद

।। पूजा सामंत

‘कुर्बान’ सिनेमापासून एका फ्रेश चेहऱयाच्या अभिनेत्रीने दिल्लीला रामराम ठोकून आई-वडिलांसह करीअर करण्यासाठी मुंबई गाठली. तिचे वडील भारतीय हवाई दलात विंग कमांडर होते. सिनेमा क्षेत्रात डाळ न शिजल्यास पुन्हा ‘चलो दिल्ली’ करायचे असे त्यांनी तिला सांगितले होते. 1992 मध्ये आमीर खान नायक असलेला मन्सूर खान दिग्दर्शित ‘जो जीता वही सिकंदर’ तिला मिळाला आणि तो बॉक्स ऑफिसवर सिकंदर ठरला. ती तारका होती आयेशा जुल्का!  त्याच वर्षी आयेशाचा अक्षय कुमारसोबत रिलीज झालेला‘खिलाडी’ हिट ठरला. आयेशाचं दिल्लीला परत जाणं रहित झालं ते आजतागायत!

माझ्या कारकीर्दीला तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. अभिनय आणि सामाजिक सेवा करण्यासाठी लग्न करू नये असा निर्णय मी घेतला होता, पण आईच्या आग्रहास्तव एका उद्योगपतीशी लग्न केलं. समाजसेवेसह मी अधूनमधून चित्रपट-ओटीटीवर काम करत असते. माझा जन्म श्रीनगरचा. माझे वडील इंदरकुमार जुल्का हे विंग कमांडर या पदावर हवाई दलात, तर आई स्नेहा जुल्का ही फॅशन डिझायनर. मनाच्या एका कोपऱयात अभिनयाचे स्पंदन निर्माण झाले टीव्हीवरील ‘चित्रहार’, ‘छायागीत’ या फिल्मी गाण्यांच्या कार्यक्रमांनी.

फॅमिली गेट-टूöगेदर, शाळेची स्नेहसंमेलनं यात माझ्या अंगात कायम अभिनेत्री संचारत असे  आणि मी झपाटल्यासारखा त्या अभिनेत्रीप्रमाणे नृत्य करत असे. आम्ही जेव्हा दिल्लीत होतो तेव्हा वडिलांचे एक मित्र गौतम सिंघानिया यांच्या ‘रेमंड‘च्या जाहिरातीचं शूटिंग दिल्लीत होतं. मुंबईहून नामांकित फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष आणि रंगभूषाकार पंढरीदादा जुकर तिथे आले होते. सिंघानिया यांनी वडिलांना सुचवलं की, आयेशाने ही आड फिल्म करावी. वडील तयार झालेत. मॉम-डॅडने बजावून सांगितलं, “यानंतर अभ्यास एके अभ्यास.’’ पण नंतर 15 दिवसांत पंढरीदादा यांचा मला फोन आला की, ‘कुर्बान’ फिल्मसाठी नवी नायिका हवी आहे. मग मी मागे लागून या संधीसाठी पालकांसह मुंबईत आले. उन्हाळी सुट्टीत हा सिनेमा मी करायचा असं ठरलं. ‘कुर्बान’साठी मी क्रीन टेस्ट दिली तेव्हा क्रीन टेस्ट म्हणजे काय हेदेखील माहीत नव्हतं. गौतम राजाध्यक्ष यांनी माझे अनेक सुंदर फोटो काढले, जे सगळीकडे सर्क्युलेट झाले. मी ऑडिशन दिली आणि निवड झाली. सलमान खान याच्या स्टारडमची तेव्हा चढती कमान होती. कारण त्याच्या ‘मैने प्यार किया’ या फिल्मला अद्वितीय यश मिळालं होतं. सुरुवातीला मला त्याच्यासोबत काम करण्याचं फार दडपण होतं, पण त्याच्या खेळकर स्वभावाने हे दडपण दूर झालं. ‘कुर्बान’ पूर्ण होण्यासाठी दोन वर्षं गेली. यादरम्यान मी ‘जो जीता वही सिकंदर’ साइन केला. मेहुल कुमार यांचा ‘मीत मेरे मन के’ साइन केला.

अभिनयाच्या आरंभीच्या काळातच मला दोनदा मृत्यू स्पर्शून गेला! ‘कुर्बान’च्या एका सीनमध्ये सलमान आणि मी रेल्वे ट्रकवर चालत असताना बाजूने रेल्वे धडधडत जाते असा सीन शूट करायचा होता, पण प्रत्यक्षात ट्रेन माझ्या मागून स्पीडने आली आणि मी ट्रेनखाली येणार त्याच क्षणी सलमानने मला जोरात खेचले. हा काय प्रकार म्हणून मी त्याच्याकडे रागाने पाहिलं तर युनिटच्या लोकांनी माझ्या भोवती गर्दी केली. माझा जीव वाचला होता. ट्रेन तोपर्यंत बाजूने गेली होती. ‘जो जीता…’च्या शूटिंगमध्ये सायकलिंग ट्रकवर शॉट घेतेवेळी मी पडले. मला खूप लागलं, पण मी नवीन होते. त्या वेळेस मी गप्प बसले. मला जखम झालीय हे न सांगण्यात शहाणपण आहे असं मला वाटलं. शूटिंगचा खोळंबा होऊ नये, नवी नायिका इश्यू करते असं चित्र निर्माण होऊ नये याची मी काळजी घेतली, पण आमीरच्या ते लक्षात आलं आणि तो काळजीने माझ्यावर रागावला. “स्वतचा जीव सर्वाधिक मौल्यवान असतो. स्वतच्या जीवाची काळजी घे. जीव वाचला तरच पुढचे चित्रपट करशील!’’ त्याने मला ताबडतोब फर्स्ट एड दिली. त्यामुळे आमीर आणि सलमान यांच्यातल्या चांगुलपणाची चुणूक मला दिसून आली.

माझ्या कारकीर्दीत एक महत्त्वाचा चित्रपट माझ्या हातून गेला. ‘जो जीता…’ सिनेमाला दिलेल्या तारखा आणि मला ऑफर झालेला ‘रोझा’ंच्या तारखा क्लॅश होत होत्या. त्यामुळे मणिरत्नम दिग्दर्शित ‘रोझा’वर मला पाणी सोडावे लागले. नाहीतर ‘जो जीता…’ सुटला असता! मिथुन चक्रवर्ती, आमीर, सलमान, अक्षय कुमार इंडस्ट्रीतल्या सगळ्या टॉप स्टारसोबत काम करण्याची संधी मिळाली होती.

नव्वदीच्या काळात गॉसिपचा सुकाळ होता. ममता कुलकर्णी आणि माझे भांडण, माझे आणि दिव्या भारतीचे भांडण अशा अनेक भन्नाट बातम्या पसरल्या, ज्यात तथ्य नव्हतं! आम्ही मुली आऊटडोअर शूटिंगला अशा अफवांचा हास्यविनोद करून समाचार घेत असू. आता ‘पेरलेल्या बातम्यां’चा सुकाळ आहे.

 कारकीर्दीच्या पुढच्या वळणावर एका निर्मात्याच्या उन्मत्त चिरंजीवाने मला लग्नाचं आश्वासन दिलं. आम्ही 3/4 चित्रपट एकत्र केले. आमचं लग्न होणार होतं, पण त्याचा खरा चेहरा उघड झाला आणि मी चक्रावले. लग्न करायचं म्हणून मी अनेक चित्रपटांना नकार देऊन बसले होते. प्रतारणा, मानहानी, दुःख, करीअरला बसलेला सेटबॅक याने मी उन्मळून पडले. या गर्तेतून आई-वडिलांनी वाचवलं. मी करीअर पुन्हा सुरू केलं खरं, पण नुकसान झालं होतं. आईने माझं लग्न उद्योगपती समीर वाशी यांच्याशी करून दिलं. इतका समजूतदार, समंजस जीवनसाथी मला मिळायचा होता म्हणून आधीचं लग्न मोडलं असावं. आम्ही दोघे मिळून समाजकार्य करतो.‘प्राणी मिगटर’ या संस्थेतर्फे आम्ही कोरोना काळात किमान 10 हजार भटक्या, बेघर कुत्र्यांना शेल्टर दिलं, शेकडोंना अन्नपाणी, औषधं पुरवली. आता आयुष्य अशा सामाजिक कार्यासाठी वाहून घ्यावं असं ठरवलं आहे. अधूनमधून अभिनय करायला मिळावा अशी इच्छा आहे. जेव्हा उत्तम ऑफर येईल तेव्हा काम करायचं मी ठरवलंय. बेघर प्राणी, विशेषत गायी-म्हशी, कुत्रे यांच्यासाठी मी ट्रस्ट चालवते. किमान 10 हजार प्राण्यांसाठी मी दररोज अन्नपाणी देते. आयुष्यात मी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यानंतर मी आई न होण्याचा निर्णय घेतला आणि या विचारात माझ्या पतीने मला पूर्ण साथ दिली. समीर आणि मी गुजरातमधील दोन गावे दत्तक घेतली असून तेथील 160 मुलांच्या शिक्षणाची आणि जेवणाची  काळजी घेतो आणि त्यातच माझा आनंद आहे.

 [email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ‘हायजॅक’, राहुल गांधींच्या लेखामुळे भाजप उघडानागडा पडला! – संजय राऊत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ‘हायजॅक’, राहुल गांधींच्या लेखामुळे भाजप उघडानागडा पडला! – संजय राऊत
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक भाजपने हायजॅक केली, चोरली, लुटली. राहुल गांधी सातत्याने हे सांगत आहेत आणि आम्हीही बोलतोय. महाराष्ट्रात भाजप आणि...
‘एचएसआरपी’ ला वाहनचालकांचा अल्प प्रतिसाद; 30 जून शेवटची तारीख, 16 जूनपासून इतर कामांना ब्रेक
Rinku Singh Priya Saroj – युरोपियन ते चायनीज; खायला सगळं मिळणार, पण फक्त ‘व्हेज’, रिंकू सिंहच्या साखरपुड्याचा मेन्यू व्हायरल
सर्जा-राजाच्या जोडीला लाखाचा भाव; वय कमी अन् ताकद जास्त
नितेश राणेंसारख्या वाचाळवीरांना मुख्यमंत्र्यांनी समज द्या – आमदार नायकवडी
Kolhapur news – एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाने मित्राचा काढला काटा, दगडाच्या खाणीत ढकलून मित्राचा केला खून
Pune crime news – अनैतिक संबंधातून महिलेसह तिच्या दोन मुलांचा खून, रांजणगाव परिसरातील तिहेरी खुनाचा उलगडा