अकरावी प्रवेश प्रक्रिया, दोन दिवसांत 9 हजार विद्यार्थ्यांनी निवडले कॉलेज
अकरावी प्रवेश प्रक्रियेचा भाग 2 (कॉलेज निवड) भरण्यासाठी शिक्षण संचालनालयाने मुदत वाढवून दिली होती. या मुदतीत 9 हजार विद्यार्थ्यांनी कॉलेज निवड केली आहे. भाग 2 भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 11 लाख 38 हजार इतकी झाली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी नियमित फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला 26 मेपासून सुरुवात झाली. अर्ज नोंदणीच्या अखेरच्या दिवशी 12 लाख 71 हजार 295 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी 12 लाख 15 हजार 190 विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क जमा केले. त्यापैकी 12 लाख 5 हजार 162 विद्यार्थ्यानी अर्जाचा भाग 1 भरला तर 11 लाख 29 हजार 924 विद्यार्थ्यांनी भाग 2 भरून अर्ज निश्चित केला. भाग 1 भरलेला, परंतु भाग 2 भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 75 हजार होती. या विद्यार्थ्यांची नियमित फेरीची संधी वाया जाऊ नये यासाठी शिक्षण संचालनालयाने अर्जाचा भाग 2 भरण्यास मुदतवाढ दिली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List