अर्जुन खोतकर यांच्या पीएचे वसुलीकांड, धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहाचे सीसीटीव्ही पोलिसांच्या ताब्यात

अर्जुन खोतकर यांच्या पीएचे वसुलीकांड, धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहाचे सीसीटीव्ही पोलिसांच्या ताब्यात

विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावे धुळे येथील विश्रामगृहात आरक्षित असलेल्या खोली क्रमांक 102 मधून 1 कोटी 84 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाची जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांनी सखोल चौकशी सुरू केली असून गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील सहा सीसीटीव्ही आणि त्यातील चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विधिमंडळ अंदाज समिती धुळे दौऱ्यावर असताना धुळय़ाच्या शासकीय विश्रामगृहातून कोटय़वधींची रक्कम जप्त करण्यात आली. विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठी पंत्राटदारांकडून या पैशांची जमवाजमव करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत धुळे जिल्हा पोलीस प्रमुख धिवरे यांनी आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी जे. पी. स्वामी यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या अनुषंगाने चर्चा केली. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि विश्रागृहातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

15 मेपासूनची नोंदवही तपासणार

गुलमोहर विश्रामगृहात 15 मेपासून 21 मेच्या रात्रीपर्यंत घडलेल्या सर्व घडामोडींचा तपास करण्यात येणार आहे. विश्रामगृहात येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची नोंद असलेली नोंदवहीदेखील ताब्यात घेण्यात आली आहे. विश्रामगृहात आलेल्या व्यक्ती कशासाठी आल्या होत्या याची चौकशीही केली जाणार आहे.

खोतकर म्हणतात माझा पी.ए. तेथे नव्हताच

गुलमोहर या शासकीय विश्रामगृहावर पैसे सापडलेल्या घटनेशी अंदाज समितीचा काहीही संबंध नाहीत. तसेच पैसे सापडलेल्या खोलीत माझा पी.ए. किशोर पाटील राहत नव्हता, असे अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे.

किशोर पाटीलला अटक करा -दानवे

– खोतकरांचा पी.ए. किशोर पाटील याला अटक करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

फडणवीसांच्या एसआयटी चौकशीवर प्रश्नचिन्ह
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे वसुलीकांडाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली आहे. मात्र आरोपींच्याच विनंती अर्जावर तपास एजन्सी बदला, असे आदेश देणाऱ्या फडणवीसांनी घोषित केलेल्या एसआयटी चौकशीवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Corona Update : कोरोनाची पुन्हा मोगलाई; दिल्ली, हरियाणा, केरळ आणि कर्नाटकासह या राज्यात नवीन रुग्ण, घरातील मास्क बाहेर येणार? Corona Update : कोरोनाची पुन्हा मोगलाई; दिल्ली, हरियाणा, केरळ आणि कर्नाटकासह या राज्यात नवीन रुग्ण, घरातील मास्क बाहेर येणार?
देशातील अनेक राज्यात कोविड-19 च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकार अलर्ट झाले आहेत. त्यांनी नागरिकांना सतर्कतेचा...
मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या, उद्या रेल्वेचा ब्लॉक, मध्य की पश्चिम रेल्वे कुठली वाहतूक मंदावणार ? जाणून घ्या पटापट
ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
कल्याण फाटा ट्रॅफिककोंडीकडे मिंधेंच्या खासदाराचा कानाडोळा; शिवसेनेने वेधले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचे लक्ष
पाच वर्षांच्या मुलाचे रोबोटिक यकृत प्रत्यारोपण, जगातील पहिली शस्त्रक्रिया असल्याचा चेन्नईच्या डॉक्टरांचा दावा
हार्वर्ड विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांना नो एन्ट्री, ट्रम्प प्रशासनाचा आणखी एक तुघलकी निर्णय; 788 हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला
न्यायालयाने तीनदा दखल घेऊनही ई-रिक्षाचा परवाना मिळेना; माथेरानच्या 74 हात रिक्षाचालकांच्या नशिबी मरणयातना