सांगली जिल्ह्यातील 83 प्रकल्पांत 81 टक्के पाणीसाठा

सांगली जिल्ह्यातील 83 प्रकल्पांत 81 टक्के पाणीसाठा

गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाने चांगली साथ दिली आहे. जिल्ह्यात सरासरीहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील 83 प्रकल्पांत आताच 81 टक्के पाणीसाठा झाला आहे, तर 56 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. उन्हाळ्यापर्यंत पाणी पुरेल, अशी शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.

सांगली जिल्ह्यात पाच मध्यम व 78 लघु असे एकूण 83 पाणी प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता 9 हजार 440 दशलक्ष घनफूट इतकी आहे. मात्र, गतवर्षी पावसाने दडी मारल्याने प्रकल्पामध्ये पाणीसाठा कमी झाला होता. जिल्ह्यात जत आणि आटपाडी तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरअखेर अवघा 35 टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

यंदा मे, जून महिन्यापासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील 83 प्रकल्पांपैकी 56 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. खानापूर, तासगाव, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यातील हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. जत तालुक्यातील सर्वाधिक म्हणजेच 15 प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागला आहे. यंदा प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यापर्यंत पाणी कमी पडणार नाही, असा अंदाज पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Buldhana News – पैशांची परतफेड केली तरीही सावकाराचा जाच सुरूच; शेतकऱ्याने विष पिऊन जीवन संपवले Buldhana News – पैशांची परतफेड केली तरीही सावकाराचा जाच सुरूच; शेतकऱ्याने विष पिऊन जीवन संपवले
मलकापुर तालुक्यातील धरणागावातील एका शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करुन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी...
समलिंगी विवाहाला मान्यता नाहीच पण ते कुटुंब बनवू शकतात! मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय
शेंद्रा एमआयडीसीच्या ट्रक टर्मिनलच्या जागेत पालकमंत्री शिरसाट पुत्राची दारूची कंपनी! इम्तियाज जलील यांचा आरोप
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन
Bangalore Stampede – विराट कोहली विरोधात तक्रार दाखल, विजयाचा जल्लोष नडणार?
ट्रेन 90 मिनिटं लेट, मदत मिळालीच नाही; क्रिकेटरचा एक्स्प्रेसमध्ये दुर्दैवी मृत्यू
Ratnagiri Fort – घेरा यशवंत गडाच्या नवीन बांधकामाची पडझड, ग्रामस्थ संतापले; पुरातत्व विभागाकडून पाहणी