Air India Chaos – 180 प्रवाशांचं बुकिंग, प्रत्यक्षात 155 प्रवाशांनाच घेऊन उडालं एअर इंडियाचं विमान; नेमकं काय घडलं?

Air India Chaos – 180 प्रवाशांचं बुकिंग, प्रत्यक्षात 155 प्रवाशांनाच घेऊन उडालं एअर इंडियाचं विमान; नेमकं काय घडलं?

गुजरातच्या भुज विमानतळावर शनिवारी पुन्हा एकदा एअर इंडियाचा सावळा गोंधळ पहायला मिळाला. भुजहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात 180 प्रवाशांचं बुकिंग होतं, मात्र प्रत्यक्षात केवळ 155 प्रवाशांना घेऊन विमानाने उड्डाण केले. 25 प्रवाशांना प्रवास करता आला नाही. यामुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला. आधीच बुकिंग करूनही प्रवास करता न आल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

काय घडलं नेमकं?

180 सीटचे विमान उड्डाण करणार होते. मात्र प्रत्यक्षात आयत्यावेळी 155 सीटचे विमान आले. यामुळे उरलेल्या प्रवाशांना प्रवास करता आला नाही. प्रवासी भुज विमानतळावर अडकून पडले आहेत. एअर इंडियाने आतापर्यंत कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहेच, पण त्यांच्या प्रवासाच्या योजनांवरही परिणाम होत आहे. प्रवाशांना भुज येथील एका खाजगी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कितीही मोठ्या बापाचा असू दे टायरमध्ये घालून झोडा, अजितदादांचे आदेश कितीही मोठ्या बापाचा असू दे टायरमध्ये घालून झोडा, अजितदादांचे आदेश
वाहतुकीच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणारा माझा नातेवाईक असला तरी त्याला टायरमध्ये घालून झोडायला सांगणार आहे, असा इशारा...
बेळगावातील कन्नड सक्तीच्या विरोधात मराठी भाषिक रस्त्यावर उतरणार!
युरोपीय युनियन, मेक्सिकोवर टेरिफ बॉम्ब डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, 1 ऑगस्टपासून होणार लागू
रंगभूमी- चिंतन नियतीवादाचे
कृषिभान- वाटचाल कुपोषणाकडून उपोषणाकडे!
माधुरीला गुजरातला पाठवण्यास विरोध, हायकोर्टाने राखून ठेवला निकाल; कोल्हापुरातील जैन संस्थेच्या हत्तीणीच्या स्थलांतराला आव्हान
विशेष – ‘उत्तराधिकारी’ निवडीचे भूराजकीय पडसाद!