दोघांना दांडक्याने मारहाण, ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास भाग पाडले…; बेंगळुरूमध्ये FIR दाखल

दोघांना दांडक्याने मारहाण, ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास भाग पाडले…; बेंगळुरूमध्ये FIR दाखल

बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन तरुणांना अज्ञातांनी मारणहाण केली. एवढचं नाही तर त्यांना “जय श्रीराम”च्या घोषणा देण्यास भाग पाडले, असा आरोप पीडित तरुणांनी केला आहे. यासंदर्भात पीडित तरुणांनी बंगळुरू पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली आहे.

जमीर असे या पीडित तरुणाचे नाव आहे. तो संपिगेहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेकॅनिक म्हणून काम करतो. पीडित मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार 22 जून रोजी संध्याकाळी साडे चारच्या दरम्यान अज्ञात लोकांच्या एका गटाने त्याच्यावर आणि त्याच्या एका मित्रावर हल्ला केला. या लोकांनी त्याच्याशी गैरवर्तन करत मारहाण केली.

तामीळनाडूच्या राज्यपालांनी विद्यार्थ्यांना ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्यायला लावल्या

या तरुणांनी हेगडेनगरमधील एजेबीजे ग्राउंडजवळ शौचासाठी त्याची कार थांबवली होती होती. तेव्हा पाच ते सहा अज्ञातांचा एक गट तिथे आला आणि आमच्यासोबत गैरवर्तन करू लागले. त्यांनी आम्हाला विचारले की रस्ता नसताना तुम्ही इथे का आलात? यानंतर त्यांनी माझा मित्र वसीमला मारहाण केली. मात्र, तो कसाबसा त्यांच्या तावडीतून निसटला, असे पीडित तरुणाने सांगितले.

वसीम त्यांच्या तावडीतून निसटल्याने त्यांनी मला काठ्यांनी मारायला सुरुवात केली. यावेळी ते मला “जय श्रीराम” बोलण्यास भाग पाडत होते, असे जमीरने पोलिसांना सांगितले. जमीरने केलेल्या आरोपांच्या आधारे संपिगेहल्ली पोलीस ठाण्यात FIR नोंदविली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कधी कधी विनाकारण नखे का तुटतात? तज्ञांनी सांगितले मोठी कारणे कधी कधी विनाकारण नखे का तुटतात? तज्ञांनी सांगितले मोठी कारणे
अनेकदा आपली नखे अचानक कोणत्याही ठोस कारणाशिवाय तुटण्याचा अनुभव आपण घेतला असेल. तुम्ही कोणतेही जड काम केलेले नाही, किंवा तुम्हाला...
किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे कोणती? डॉक्टरांकडून जाणून घ्या
CBSE Board Exam – सीबीएससी आता दोनदा घेणार दहावीची बोर्डाची परीक्षा, विद्यार्थ्यांना मिळणार सुधारणेची संधी
‘गुतंवणूकदार’ मालामाल! सेन्सेक्समध्ये 700 अंकांची उसळी; 4 लाख कोटींचा झाला फायदा
मुंबई महापालिका शिवसेना जिंकणारच, चंद्रकांत खैरे यांचे प्रतिपादन; यापुढील आंदोलन महायुतीच्या भ्रष्टाचाराविरोधात
स्वातंत्र्यासाठी योगदान न देणारे आता संविधानावर बोलत आहेत, मल्लिकार्जुन खर्गे यांची भाजपवर टीका
Ashadhi Wari 2025 – खासदारताई गायब! वारीच्या नियोजन बैठकांना प्रणिती शिंदेंची दांडी; मतदारांतून नाराजीचा सूर