मधमाशी गिळल्याने करिश्माच्या पूर्व पतीचा मृत्यू? किती प्राणघातक ठरू शकतो डंख?

मधमाशी गिळल्याने करिश्माच्या पूर्व पतीचा मृत्यू? किती प्राणघातक ठरू शकतो डंख?

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरचं 12 जून रोजी निधन झालं. इंग्लंडमध्ये पोलो खेळताना संजय कपूरचं निधन झाल्याची माहिती समोर आली. सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलं गेलं होतं. परंतु नंतर एक धक्कादायक दावा समोर आला की संजयने पोलो खेळताना चुकून मधमाशी गिळली. त्यामुळेच त्याची प्रकृती अचानक बिघडली. या घटनेनंतर मधमाशी गिळल्याने खरंच हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

मधमाशी गिळल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का?

सर गंगाराम रुग्णालयातील औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. एम. वल्ली यांनी ‘आजतक डॉट इन’शी बोलताना याबद्दल सविस्तर माहिती दिली. मधमाशीने संजयच्या जीभेचा चावा घेतल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. जीभ ही आपल्या शरीराची अत्यंत संवेदनशील आणि रक्तवाहिन्यांनी भरलेली रचना आहे. जर मधमाशीने जिभेला चावलं असेल तर तिचं विष लगेच रक्तात जाऊ शकतं. यामुळे लगेचच आपलं शरीर ॲलर्जिक प्रतिक्रिया देऊ शकते. डॉ. वल्ली यांनी पुढे स्पष्ट केलं की, सर्वसामान्यपणे ॲलर्जीच्या प्रतिक्रिया सौम्य असू शकतात. जसं की त्वचेवर खाज सुटणं किंवा लाल पुरळ येणं. परंतु जे लोक ॲलर्जीच्या बाबतीत अतिसंवेदनशील असतात, त्यांच्यामध्ये ही प्रतिक्रिया खूप गंभीर असू शकते, ज्याला वैद्यकीय भाषेत ॲनाफिलेक्सिस म्हणतात. ही स्थिती इतकी गंभीर असू शकते की त्यामुळे श्वसनमार्गात सूज येऊ शकते, रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो आणि हृदयविकाराचा झटकादेखील येऊ शकतो.

या प्रकरणात इतर अनेक तज्ज्ञांनीही आपली मतं नोंदवली आहेत. बंगळुरूच्या किम्स हॉस्पिटलमधील वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. दीपक कृष्णमूर्ती यांनी याला ‘कौनिस सिंड्रोम’ या दुर्मिळ आजाराशी जोडलं आहे. एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी लिहिलं की, हे एक दुर्मिळ प्रकरण आहे. कौनिस सिंड्रोम ही एक गंभीर ॲलर्जीक प्रतिक्रिया आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. संजय कपूरने पोलो खेळताना मधमाशी गिळली, त्यानंतर मधमाशीने घशाला चावा घेतला असावा आणि त्यामुळेच ॲनाफिलेक्सिस आणि मायोकार्डियल इन्फार्क्शन झाला असावा, ज्यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा.

मधमाशीचं विष जर तोंडात किंवा घशात चावल्यामुळे रक्तप्रवाहात गेलं तर त्यामुळे श्वसनमार्गात सूज येऊ शकते, रक्तदाबात तीव्र घट होऊ शकते आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, असंही तज्ज्ञांनी म्हटलंय. ही एक प्रकारची मेडिकल इमर्जन्सी केस ठरू शकते.

मधमाशीचा डंख किती धोकादायक?

मधमाशीच्या डंखामुळे सहसा सौम्य जळजळ, सूज किंवा खाज येते. परंतु जर चावा घशात किंवा तोंडात घेतला असेल तर ते अधिक धोकादायक ठरू शकतं. मेलबर्न विद्यापिठाच्या अहवालानुसार, मधमाशीचं विष हे प्रथिने आणि रसायनांचं एक शक्तिशाली मिश्रण आहे. ज्यामुळे काही लोकांमध्ये गंभीर ॲलर्जीक प्रतिक्रिया दिसू शकतात. जर चावा श्वासनलिकेला घेतला असेल तर सूज येऊन श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ शकते आणि हृदयावरील ताण वाढू शकतो.

अशा परिस्थितीत नेमकं काय करावं?

मधमाशी चावल्यास त्वरित उपाय करणं आवश्यक आहे. विषाचा परिणाम कमी करण्यासाठी 30 सेकंदांच्या आत डंख काढून टाकावा. जर डंख घशात असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, चक्कर येणं किंवा तीव्र सूज येणं अशी लक्षणे दिसली तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हातात फोटो…डोळ्यात अश्रू…मनात दुःख.. लष्करी गणवेशात कर्नल पत्नीचा पायलट पतीला अखरेचा निरोप हातात फोटो…डोळ्यात अश्रू…मनात दुःख.. लष्करी गणवेशात कर्नल पत्नीचा पायलट पतीला अखरेचा निरोप
केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात 15 जून रोजी जयपूरचे राजवीर सिंह यांचे निधन झाले. जयपूरमधील चांदपोल मोक्षधाम येथून त्यांची अंतिम यात्रा मंगळवारी...
कोणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही, शरद पवार यांची स्पष्ट भूमिका
Kitchen Cleaning Tips- किचन चकाचक ठेवण्यासाठी या वस्तू तुमच्या घरी असायलाच हव्यात
राजा रघुवंशीच्या हत्येला काळ्या जादूचे वळण, वडिलांनी दिली महत्त्वाची माहिती
रात्री झोप येत नसेल तर तुमच्या आहारात ‘या’ पाच पेयांचा करा समावेश
सकाळी उठल्यानंतर किती ग्लास पाणी पिणे शरीरासाठी ठरेल फायदेशीर, आहार तज्ज्ञांकडून जाणून घ्या
नितेश राणेंचा पोपट झाला रे, सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून संजय राऊत यांचा टोला