नरेंद्र मोदी हे भित्रे भागुबाई, युद्धबंदी का जाहीर करावी लागली?
भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या शस्त्रसंधी वरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भित्रे भागुबाई आहेत, असे म्हणत जोरदार हल्ला चढवला. युद्धबंदी का जाहीर करावी लागली याचे स्पष्टीकरण पेंद्र सरकारने द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
इराणसारखा देश डोनाल्ड ट्रम्प यांना भीक घालत नाही. पण भारत-पाकिस्तान युद्धा दरम्यान मोदींनी तशी भूमिका घेतली नाही तर युद्धबंदी केली. आपले पंतप्रधान कणा नसलेले नेतृत्व असून मोदी हे भित्रे भागूबाई असल्याचे यातून सिद्ध झाले, असे प्रकाश आंबेडकर मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.
पंतप्रधानांमध्ये ट्रम्पचा दावा खोडण्याची धमक नाही
पहलगामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर जी लढाई झाली त्याचे नियंत्रण हे ट्रम्प यांच्याकडे होते. भारत-पाकिस्तानने किती दिवस लढायचे, कधी थांबायचे हे त्यांनी ठरवले. ट्रम्प यांचा दावा खोडून काढण्याची धमकही मोदी यांच्याकडे नाही, असा टोला आंबेडकर यांनी लगावला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List