Air India Plane Crash – हिंदुस्थानातील सर्वात भयंकर 10 विमान अपघात!

Air India Plane Crash – हिंदुस्थानातील सर्वात भयंकर 10 विमान अपघात!

गुरुवारी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातानंतर विमान सेवा आणि सुरक्षिततेबाबतची चर्चा पुन्हा एकदा वाढली आहे. याआधीची शेवटची मोठी दुर्घटना 2020 मध्ये कालिकतमध्ये घडली होती. यामध्ये 21 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. 12 नोव्हेंबर 1996 चरखी दादरी येथे झालेला विमान अपघात, ज्यामध्ये 349 जणांचा मृत्यू झाला होता, तो देशातील सर्वात मोठा हवाई अपघात होता.

कालिकत (कोझिकोड) – (7 ऑगस्ट 2020) – दुबईहून येणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान 1344 कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना कोसळले. त्यात 21 जणांचा मृत्यू झाला. विमान ओल्या धावपट्टीवरून घसरले आणि त्याचे दोन भाग झाले.

Air India Plane Crash – टेकऑफ दरम्यान विमानं कोसळण्याची नेमकी कारणं कोणती?

मंगलोर- (22 मे 2010): एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट 812 मंगलोरमध्ये धावपट्टीवरून घसरली. ज्यामुळे 158 जणांचा मृत्यू झाला. खड्ड्यात कोसळल्यानंतर विमानाचे तुकडे झाले.

पाटणा- (17 जुलै 2000)- अलायन्स एअर फ्लाइट 7412 पाटणा येथे लँडिंग करताना कोसळली. त्यात 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. विमानाचे नियंत्रण सुटल्याने पायलटच्या चुकीमुळे हा अपघात झाला.

चरखी दादरी- (12 नोव्हेंबर 1996)- सौदी अरेबियन एअरलाइन्सचे बोईंग 747 आणि कझाकस्तान एअरलाइन्सचे इल्युशिन इल-76 विमान दिल्लीजवळ टक्कर झाले. ज्यामुळे दोन्ही विमानांमधील सर्व 349 जण ठार झाले. पायलटची चूक आणि हवाई वाहतूक नियंत्रणाशी चुकीचा संवाद हे त्याचे कारण होते.

Air India Plane Crash – डोंबिवलीची ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर रोशनी सोनघरे मृत्यूमुखी

औरंगाबाद- (26 एप्रिल 1993)- इंडियन एअरलाइन्सचे बोईंग 737 हे विमान औरंगाबादहून उड्डाण केल्यानंतर ट्रक आणि विजेच्या तारांना धडकून कोसळले, ज्यामध्ये 55 जणांचा मृत्यू झाला.

इम्फाळ – (16 ऑगस्ट 1991)- इंडियन एअरलाइन्सचे फ्लाइट 257 इंफाळजवळ कोसळले, त्यात सर्व 69 जणांचा मृत्यू झाला.

बंगळुरू – (14 फेब्रुवारी 1990)- इंडियन एअरलाइन्सचे फ्लाइट 605, एअरबस ए 320, बंगळुरूजवळ कोसळले, त्यात 92 जणांचा मृत्यू झाला.

अहमदाबाद- (19 ऑक्टोबर 1988)- इंडियन एअरलाइन्सचे फ्लाइट 113 अहमदाबादमध्ये कोसळले, त्यात 133 जणांचा मृत्यू झाला.

मुंबई – (21 जून 1982) – एअर इंडिया फ्लाईट 403 मुंबई विमानतळावर कोसळले, त्यात 17 जणांचा मृत्यू झाला.

मुंबई- (1 जानेवारी 1978 )- एअर इंडियाचे विमान 855 (बोईंग 747) मुंबईहून उड्डाण घेतल्यानंतर अरबी समुद्रात कोसळले, त्यात सर्व 213 जणांचा मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर? मध्यपूर्वेत घमासान, बगदादवरही तुफान हल्ले; युरोपीय देशांकडून तयारी सुरू जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर? मध्यपूर्वेत घमासान, बगदादवरही तुफान हल्ले; युरोपीय देशांकडून तयारी सुरू
जगातील अनेक भागांमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे. एकीकडे 30 दिवसांच्या युद्धविरामानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झाली, तर...
जिल्हाधिकाऱ्यांचा दांडीबहाद्दर 19 नायब तहसीलदारांना दणका
Israel-Iran War – इराणकडून आगीत ‘तेल’; युद्धाचा भडका, इस्रायलवर हल्ला करत इमारती लक्ष्य
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 14 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी शिवसेना सरसावली, रेल्वेच्या स्वयंचलित दरवाजामुळे प्रवासी गुदमरण्याचा धोका; चांगल्या सुविधा देण्याची मागणी
दादरच्या सावरकर सदनाचे बांधकाम जैसे थे, राष्ट्रीय स्मारकाच्या दर्जाबाबत प्रतिज्ञापत्रसादर करण्यासाठी सरकारला मुदतवाढ
कृत्रिम तलावांतील विसर्जनाच्या सक्तीमुळे चेंगराचेंगरीचा धोका! विसर्जन नैसर्गिक जलस्रोतामध्ये करण्याची परवानगी द्या