मुंबईत रेल्वे अपघात होतायत आणि ‘रीलमंत्री’ फक्त बुलेट ट्रेनवर लक्ष देतायत; आदित्य ठाकरे यांची टीका

मुंबईत रेल्वे अपघात होतायत आणि ‘रीलमंत्री’ फक्त बुलेट ट्रेनवर लक्ष देतायत; आदित्य ठाकरे यांची टीका

‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी रेल्वेवर अपघाती मृत्यूचे सत्र सुरूच आहे. या दरम्यानच एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मुंबईत रेल्वे अपघातात गेल्या 11 वर्षात 29970 प्रवाशांचे मृत्यू झाले आहेत. त्यावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी रेल्वे मंत्री अश्विणी वैष्णव यांना फटकारले आहे.

”मुंबईत रेल्वे अपघात होत असताना रील मंत्री बुलेट ट्रेनवर लक्ष देतायत. या बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काहीही उपयोग नाही. बुलेट ट्रेनसाठी BKC मधली मोक्याची जागा फुकटात घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातलं आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र देखील हिसकावून घेण्यात आले. या सर्व खर्चांपेक्षा मुंबई लोकल ट्रेनच्या सुधारणांवर पैसा खर्च करायला हवा, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

रेल्वे अपघातांतील मृत्यू

मध्य रेल्वे मार्ग – 29,321 मृत्यू (2009 ते जून 2024)
पश्चिम रेल्वे मार्ग – 22,481 मृत्यू, 26,572 जखमी (2005 ते जुलै 2024)

मागील 20 वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 51 हजारांहून अधिक प्रवाशांचा हकनाक बळी गेला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई – गोवा महामार्गावरील घाट प्रवास बिकट मुंबई – गोवा महामार्गावरील घाट प्रवास बिकट
मुंबई–गोवा महामार्गावरील अवघड वळणे जीवघेणी ठरत आहेत. महामार्गाचे अर्धवटस्थितीत काम आणि ठिकठिकाणी असलेले पर्यायी रस्ते पावसाळ्य़ात अधिक धोकादायक ठरत आहेत....
फडणवीस-राज ठाकरे भेट… मिंधेंना टेन्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीला आव्हान, 16 जूनपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करा; हायकोर्टाचे याचिकाकर्त्यांना आदेश
मतचोरीबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची सारवासारव, कायद्यांनुसार मतदारांची नावे समाविष्ट किंवा वगळण्याची तरतूद नाही
अखेर कामाठीपुराचा पुनर्विकास मार्गी लागणार, 8 हजार रहिवाशांना मिळणार हक्काचे घर; कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी नेमण्यासाठी म्हाडातर्फे निविदा प्रसिद्ध 
प्रकल्पग्रस्तांसाठी आता मुलुंडमध्ये 6731 घरे, पालिकेचे प्रकल्प मार्गी लागणार
वरळी, नायगाव बीडीडीवासीयांना सप्टेंबरमध्ये मिळणार नव्या घरांच्या चाव्या; ना. म. जोशी मार्गावरील रहिवाशांना डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा