Air India Plane Crash – नैतिकतेच्या आधारावर नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी राजीनामा द्यावा – सुब्रमण्यम स्वामी
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे 242 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप याबाबत अधिकृत आकडा समोर आलेला नाही. दरम्यान या दुर्घटनेवरून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागितला आहे.
When a train derailed in 1950s, Lal Bahadur Shashtri resigned. On the same morality I demand PM Modi, HM Amit Shah and Civil Aviation Naidu resign so that a free& fair inquiry is held. All that Modi and associates have been doing so far is galavanting which must stop must stop.
— Subramanian Swamy (@Swamy39) June 12, 2025
”1950 साली जेव्हा एका रेल्वे अपघातानंतर तत्कालिन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. त्याच नैतिकतेच्या आधारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, हवाई उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी राजीनामा दिला पाहिजे”, असे स्वामी यांनी ट्विट केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List