Ratnagiri News – पुढील दोन दिवस रत्नागिरीत रेड अलर्ट, अतिमुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता

Ratnagiri News – पुढील दोन दिवस रत्नागिरीत रेड अलर्ट, अतिमुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता

रत्नागिरी जिल्ह्यात पुढील दोन दिवस 13 आणि 14 जू रोजी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर त्यानंतर पुढील दोन दिवस 15 आणि 16 जून रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आहे. या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्‍याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (02352) 222233 / 226248 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क करा, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.

विजा चमकत असताना विद्युत उपकरणे बंद ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. वीज चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. वीज चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरीता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी ॲप’ डाऊनलोड करून घ्यावे.

मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी रहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करु नका. घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करुन घ्या. पाऊस पडत असताना वीजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नका. मोबाईलवर संभाषण करु नये. इलेक्ट्रिक वस्तूपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीचा आसरा घ्यावा.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा

जिल्हा आपती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी 02352- 226248 /222233
जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 02352-222222. पोलीस टोल फ्री हेल्पलाईन 112
जिल्हा रुग्णालय 02352-222363
महावितरण, रत्नागिरी नियंत्रण कक्ष 7875765018
तहसिल कार्यालय रत्नागिरी 02352-223127
तहसिल कार्यालय लांजा 02351-230024
तहसिल कार्यालय राजापूर 02353-222027
तहसिल कार्यालय संगमेश्वर 02354-260024
तहसिल कार्यालय चिपळूण 02355-252044/9673252044
तहसिल कार्यालय खेड 02356- 263031
तहसिल कार्यालय दापोली 02358-282036
तहसिल कार्यालय गुहागर 02359-240237
तहसिल कार्यालय मंडणगड 02350-225236

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Photo: जगातील सर्वात खतरनाक मशरूम, एकदा खाल्ल्यास मृत्यू निश्चित Photo: जगातील सर्वात खतरनाक मशरूम, एकदा खाल्ल्यास मृत्यू निश्चित
तुमच्यापैकी अनेकांनी मशरूमची भाजी आवडत असेल. शास्त्रज्ञांच्या मते यात अनेक पोषक घटक आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डेथ...
काजळाप्रमाणे डोळ्यांत लावा साजूक तूप, आयुर्वेदात सांगितले आहेत हे आश्चर्यकारक फायदे
टाटा समूहाच्या इतिहासातील हा सर्वात काळा दिवस, टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांचे सहकाऱ्यांना पत्र
India Tour Of England – टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या आईला आला हृदयविकाराचा झटका
Air India Plane Crash – कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला; बोइंग ड्रीमलायनर्सच्या ताफ्याची तपासणी होणार, DGCA चा मोठा निर्णय
Air India Plane Crash – दोन मुलांना घेऊन नवीन घरात प्रवेश करण्याचं स्वप्न अपघाताने हिरावलं, केरळच्या रंजीताचा दुर्दैवी मृत्यू
आयुर्वेदानुसार चुकूनही या पदार्थांचे सेवन एकत्र करु नये