हा तुमचा कुठला कारभार? चार वर्ष वीज जोडणी मिळत नाही; शिवसेना उपनेते बाळ मानेंनी महावितरणला धरले धारेवर

हा तुमचा कुठला कारभार? चार वर्ष वीज जोडणी मिळत नाही; शिवसेना उपनेते बाळ मानेंनी महावितरणला धरले धारेवर

रस्त्यावरील बेकायदेशीर बांधकामांना वीजजोडणी मिळते. मात्र एका माणसाला त्याच्या घरासाठी चार वर्षे वीज जोडणी मिळत नाही हा तुमचा काय कारभार आहे. तो माणूस नाही का? वीज मिळणे हा त्याचा हक्क नाही का? असा खणखणीत सवाल विचारत आम्ही संयम राखला हा आमचा दुबळेपणा समजू नका, नाहीतर आमचा संयम सुटला तर तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी दिला. रत्नागिरी जिल्ह्यातील विजेच्या समस्यांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन करत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

रत्नागिरी जिल्ह्यात वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पाऊस सुरू झाला की वीज गायब असे प्रकार वारंवार घडत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील खरवते उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. तसेच त्याठिकाणी वायरमनही उपलब्ध नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वायरमन नसल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक ठिकाणी गंजलेले वीजेचे खांब बदलेले नाहीत. उच्च विद्युतभारीत वीजवाहिनीवरील झाडांच्या फांद्याची साफसफाई करण्यात आली नाही. भूमिगत वीजवाहिनीचे काम अपूर्ण असल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. स्मार्ट मीटरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोध केलेला असतानाही रत्नागिरी जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे ते तात्काळ बंद करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जिल्ह्यातील विजेच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, विभागप्रमुख मयुरेश पाटील, किरण तोडणकर, महिला आघाडी विधानसभा संघटक सायली पवार, माजी नगरसेवक नितीन तळेकर उपस्थित होते.

रत्नागिरी- भोके बस सुरू करा

रत्नागिरी बसस्थानकातून दररोज सकाळी साडे आठ वाजता सुटणारी रत्नागिरी-भोके बस गेली दीड वर्ष बंद करण्यात आली आहे. बस बंद झाल्याने अनेक विद्यार्थी, महिला, नोकरदार वर्गाची गैरसोय झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी- भोके ही सकाळी साडे आठ वाजता सुटणारी बस सुरू करा, तसेच भोके-रेवाळेवाडी बससेवा सुरू करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Photo: जगातील सर्वात खतरनाक मशरूम, एकदा खाल्ल्यास मृत्यू निश्चित Photo: जगातील सर्वात खतरनाक मशरूम, एकदा खाल्ल्यास मृत्यू निश्चित
तुमच्यापैकी अनेकांनी मशरूमची भाजी आवडत असेल. शास्त्रज्ञांच्या मते यात अनेक पोषक घटक आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डेथ...
काजळाप्रमाणे डोळ्यांत लावा साजूक तूप, आयुर्वेदात सांगितले आहेत हे आश्चर्यकारक फायदे
टाटा समूहाच्या इतिहासातील हा सर्वात काळा दिवस, टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांचे सहकाऱ्यांना पत्र
India Tour Of England – टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या आईला आला हृदयविकाराचा झटका
Air India Plane Crash – कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला; बोइंग ड्रीमलायनर्सच्या ताफ्याची तपासणी होणार, DGCA चा मोठा निर्णय
Air India Plane Crash – दोन मुलांना घेऊन नवीन घरात प्रवेश करण्याचं स्वप्न अपघाताने हिरावलं, केरळच्या रंजीताचा दुर्दैवी मृत्यू
आयुर्वेदानुसार चुकूनही या पदार्थांचे सेवन एकत्र करु नये