जे मुंब्यात तेच विरारमध्ये; जीवघेणा प्रवास संपेना

जे मुंब्यात तेच विरारमध्ये; जीवघेणा प्रवास संपेना

मुंब्रा दुर्घटनेनंतर मध्य वसई औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी विरारनंतर नालासोपारा व वसई रोड स्थानकात उतरणे म्हणजे मोठे दिव्य असते. सकाळ, संध्याकाळच्या वेळी लोकलमध्ये चढताना आणि उतरताना जीवावर उदार व्हावे लागते.

रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वे मार्गावरही प्रवाशांना जीव धोक्यात घालून धोकादायक प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पश्चिम रेल्वेच्या विरार अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवरून प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत. जी स्थिती मुंब्यात तिच स्थिती विरारमध्येही आहे. पश्चिम रेल्वेचा विस्तार चर्चगेटपासून डहाणूपर्यंत झालेला असला तरी विरार स्थानकातून सकाळच्या वेळी नोकरी व्यवसायासाठी मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

नुकताच विरार लोकलचा १५८ वा वाढदिवस साजरा झाला. मात्र अनेक वर्षांपासून या विरार लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाली नाही. परिणामी रोजच अप आणि डाऊन मार्गावर विरार लोकलच्या फुटबोर्डवरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. लोकल गर्दीवर पर्याय म्हणून वसई-विरारमध्ये मेट्रोचा विस्तार प्रस्तावित आहे. मुंब्रा दुर्घटनेनंतर आता त्यादृष्टीने प्रशासनाकडून जलद पावले उचलली जाणार आहेत. वसई विरार-नालासोपार येथे नागरीवस्ती वाढत चालली आहे.

३२ लाखांचा टप्पा या शहराने पार केला आहे. त्यामुळे तिथून मुंबईत कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळेच वसईपर्यंत मेट्रो नेण्याची घोषणा करण्यात आली आहे. भौगोलिक रचना, हवामान याचा अभ्यास करून सर्वेक्षणाचे काम येत्या काही महिन्यांत पूर्ण होणार आहे. मीरा-भाईंदर शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाचा मार्ग जोडला जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई – गोवा महामार्गावरील घाट प्रवास बिकट मुंबई – गोवा महामार्गावरील घाट प्रवास बिकट
मुंबई–गोवा महामार्गावरील अवघड वळणे जीवघेणी ठरत आहेत. महामार्गाचे अर्धवटस्थितीत काम आणि ठिकठिकाणी असलेले पर्यायी रस्ते पावसाळ्य़ात अधिक धोकादायक ठरत आहेत....
फडणवीस-राज ठाकरे भेट… मिंधेंना टेन्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीला आव्हान, 16 जूनपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करा; हायकोर्टाचे याचिकाकर्त्यांना आदेश
मतचोरीबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची सारवासारव, कायद्यांनुसार मतदारांची नावे समाविष्ट किंवा वगळण्याची तरतूद नाही
अखेर कामाठीपुराचा पुनर्विकास मार्गी लागणार, 8 हजार रहिवाशांना मिळणार हक्काचे घर; कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी नेमण्यासाठी म्हाडातर्फे निविदा प्रसिद्ध 
प्रकल्पग्रस्तांसाठी आता मुलुंडमध्ये 6731 घरे, पालिकेचे प्रकल्प मार्गी लागणार
वरळी, नायगाव बीडीडीवासीयांना सप्टेंबरमध्ये मिळणार नव्या घरांच्या चाव्या; ना. म. जोशी मार्गावरील रहिवाशांना डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा