कॅन्सरच्या गाठीमध्ये वेदना होतात का? तज्ज्ञांनी सांगितली आहेत ही लक्षणे, तुम्हालाही आढळली तर सावधान!
कॅन्सर म्हटलं की भल्याभल्यांचे खच्चीकरण होते. गेल्या 10 वर्षांत तर कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. महिलांमध्येही कॅन्सरचे प्रमाण आता वाढताना दिसत आहे. स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर हा महिलांमध्ये सर्वात सामान्य कॅन्सर आहे. कॅन्सर हा सर्वात धोकादायक आजार मानला जातो. जर तो वेळेवर समजला नाही तर जगणे कठीण होते. या प्राणघातक आजारापासून वाचण्यासाठी सर्वांनाच खूप सतर्क राहण्याची गरज आहे. निरोगी जीवनशैली स्वीकारण्याची गरज आहे. तसेच, शरीरात कोणत्याही प्रकारचा बदल दिसला तर तो ताबडतोब डॉक्टरांना दाखवावा. कधीकधी शरीरात अशा गाठी तयार होतात की आपल्याला त्या सामान्य वाटतात आणि त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. काही लोकांचा असा विश्वास आहे की जर गाठींमध्ये वेदना होत नसतील तर ती सामान्य आहे. पण कॅन्सरच्या गाठीत वेदना होते की नाही? आणि ती गाठ कॅन्सरचीच आहे हे कशावरून ओळखावं. याबाबत तज्ज्ञ काय सांगतात ते पाहुयात.
कॅन्सरच्या गाठीमध्ये वेदना असतात का?
बऱ्याच वेळा शरीरात अशा गाठी तयार होतात ज्यात वेदना जानवतात. तर काही गाठी वेदनारहित असतात. डॉक्टरांच्या मते, कोणत्याही गाठीकडे दुर्लक्ष करू नये. अनेक डॉक्टरांनी असे सांगितले आहे की सुरुवातीला कॅन्सरच्या गाठीमध्ये वेदना होणे आवश्यक नाही. बऱ्याच वेळा जेव्हा ही गाठी लहान आकाराची असते तेव्हा त्या वेदनारहित असतात. परंतु जेव्हा गाठींचा आकार वाढतो आणि गाठी त्यांच्या सभोवतालच्या संरचनेत पसरतात तेव्हा वेदना जाणवू शकतात. याशिवाय, बायोप्सीनंतर कॅन्सरच्या गाठींमध्ये वेदना होऊ शकतात. किंवा संसर्ग असला तरीही, कॅन्सरच्या गाठींमध्ये वेदना जाणवू शकतात.
ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या
तज्ज्ञांच्या मते कधीकधी गाठीमध्ये सौम्य वेदना होतात आणि कधीकधी अजिबात वेदना होत नाहीत. गाठीतून द्रव किंवा रक्त बाहेर पडल्यास ते धोकादायक ठरू शकते. शरीरात कुठेही गाठ असल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले.
कॅन्सरची मुख्य लक्षणे
भूक न लागणे आणि वजन लवकर कमी होणे ही कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे आहेत.
सतत खोकला आणि रक्तस्त्राव होणे हे कॅन्सरचे लक्षण असू शकते.
आवाजात बदल होणे हे फुफ्फुसांच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.
जर पोटात तीव्र वेदना होत असतील किंवा कावीळ होत असेल तर ते देखील कॅन्सरचे लक्षण आहे.
अचानक शरीरावर अनेक चामखीळ येणे हे देखील कॅन्सरचे लक्षण असू शकते.
कोणत्याही वेदनाशिवाय लघवीतून रक्त येणे हे कॅन्सरचे लक्षण असू शकते.
अन्न खाण्यात अडचण येणे, मसालेदार किंवा गरम अन्न खाण्यात अडचण येणे हे कॅन्सरचे लक्षण असू शकते.
त्यामुळे गाठ जाणवली तर त्यात वेदना होतेय की नाही यावरून अंदाज लावण्यापेक्षा थेट डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणे कधीही चांगले.
(डिस्क्लेमर: ही माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्याशी संबंधित कोणताही बदल करण्यापूर्वी किंवा कोणत्याही आजाराशी संबंधित उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List