ताप असताना आंघोळ करणे फायदेशीर आहे की हानिकारक? डॉक्टर काय सांगतात?
On
हवामान बदललं की व्हायरल फिव्हरची समस्या वाढते. जेव्हा आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारचा संसर्ग होतो तेव्हा शरीराचे तापमान वाढते. जेणेकरून बॅक्टेरिया किंवा विषाणू नष्ट होऊ शकतात. जेव्हा ताप येतो तेव्हा त्यांचे शरीर गरम होते आणि ही उष्णता दूर करण्यासाठी बरेच लोक थंड पाण्याने आंघोळ करतात. अनेकदा प्रश्न पडतो की तापात आंघोळ करावी का? यावर लोकांचे वेगवेगळी मतं आहेत. काही लोक म्हणतात की तापात आंघोळ केल्याने स्थिती बिघडू शकते, तर अनेकांचा असा विश्वास आहे की त्यामुळे शरीराला आराम मिळतो. याबद्दल डॉक्टरांचं मत काय आहे ते जाणून घेऊयात.
तापापासून आराम मिळण्यासाठी…
तज्ज्ञांच्या मते जेव्हा ताप येतो तेव्हा शरीराचे तापमान सामान्यपेक्षा जास्त होते. शरीराचे सामान्य तापमान 98.6°F म्हणजेच 37°C असते. जेव्हा ते 100°F किंवा त्याहून अधिक वाढते तेव्हा व्यक्तीला अशक्तपणा, थंडी वाजून येणे, डोकेदुखी आणि घाम येणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. तापापासून आराम मिळण्यासाठी औषध दिले जाते. यामुळे शरीराचे तापमान हळूहळू सामान्य होते.
ताप असताना आंघोळ करणे…
तज्ज्ञांच्या मते, ताप असताना आंघोळ करणे हानिकारक नाही, परंतु ते व्यक्तीच्या स्थितीवर अवलंबून असते. तापात कोमट पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीरावर साचलेला घाम आणि बॅक्टेरिया निघून जातात, त्वचा स्वच्छ राहते आणि व्यक्तीला ताजेतवाने वाटते. जर व्यक्ती खूप कमकुवत नसेल आणि तापमान खूप जास्त नसेल तर आंघोळ करणे सुरक्षित मानले जाते. तथापि, जर ताप खूप जास्त असेल आणि व्यक्तीला थंडी वाजत असेल तर त्या स्थितीत आंघोळ करणे टाळावे. अशा परिस्थितीत, स्पंज बाथ हा एक चांगला पर्याय असू शकतो. त्यामुळे शरीर स्वच्छ राहते आणि तापमान देखील नियंत्रित राहते.
तापाच्या तीव्रतेवर आणि व्यक्तीची परिस्थिती कशी यावर हा उपाय अवलंबून
तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही तापाच्या वेळी आंघोळ करण्याच्या स्थितीत नसाल, तर तुम्ही कोमट पाण्यात भिजवलेल्या मऊ टॉवेलने शरीर पुसू शकता. याला स्पंज बाथ म्हणतात. हे विशेषतः मुले, वृद्ध आणि खूप तापाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. ते शरीराला थंड करते आणि अस्वस्थता कमी करते. एकंदरीत, असे म्हणता येईल की तापाच्या वेळी आंघोळ केल्याने आजारावर फारसा फरक पडत नाही. ते तापाच्या तीव्रतेवर आणि व्यक्तीची परिस्थिती कशी आहे यावर अवलंबून असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
25 Jun 2025 04:03:58
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अकोला जिह्यातील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत....
Comment List