ते सहा दहशतवादी आकाशात गेले की जमिनीत? की भाजपात सामिल झाले, संजय राऊत यांचा खरमरीत सवाल

ते सहा दहशतवादी आकाशात गेले की जमिनीत? की भाजपात सामिल झाले, संजय राऊत यांचा खरमरीत सवाल

ज्या सहा दहशतवाद्यांनी आमच्या माता भगिनींचे कुंकू पुसले ते गेले कुठे? आकाशात गेले की जमिनीत गेले की भाजपात गेले आहेत? असा खरमरीत सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना “पहलगाम हल्ला हा गृहमंत्रालयाच्या चुकीमुळे झाला असून त्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यायला हवा”, अशी मागणी केली आहे.

”मी ऑपरेशन सिंदूरवर कधीही टीका केलेली नाही. ऑपरेशन सिंदूर आमच्या देशाच्या लष्कराच्या पराक्रमाचाी गाथा आहे. त्यावरून जे राजनिती करतायत ते फेल झालेयत. मी सर्वपक्षीय बैठकीतही सांगितले होते की त्या सहा दहशतवाद्यांना पकडून दिल्लीत आणून त्यांची ओळख पटवून इंडिया गेटसमोर त्यांचे एनकाऊंटर करा तेव्हा ऑपरेशन सिंदूर पूर्ण होईल. यावरून भाजपला मिरची लागायची गरज नाही. ऑपरेशन सिंदूरवरून जे राजकारण करतायत त्यावरून लोकांमध्ये भ्रम निर्माण झालाय. काहीतरी चुकीचं झालंय. ते लपवण्यासाठी तिरंगा यात्रा काढतायत. तुम्ही आम्हाला सांगितलं की राजकारण करू नका. विरोधकांनी ते ऐकलं. आम्ही राजकारण नाही केलं. पण राजकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा करत आहेत. माझी मागणी आहे की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. कारण जे 26 लोकं मारले गेले ते गृहमंत्रालयाच्या चुकीमुळे ते त्यांचे अपयश आहे. त्यामुळे आपल्याला ऑपरेशन सिंदूर करावं लागलं. त्यामुळे हल्ल्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घ्यायला हवी ना. कुठे गेले ते दहशतवादी, आकाशात गेले की जमिनीत गेले की भाजपात गेले? सगळ्या प्रकारचे लोकं भाजपात जातायत. मग काय तुम्ही लपवलय का त्यांना? त्यासाठी सर्व विरोधकांनी गृहमंत्र्याचा राजीनामा मागितला हवा. राहुल गांधी, खरगेजींना राजीनामा मागितला पाहिजे. आम्ही सरकारचे समर्थन केले आहे. गृहमंत्र्यांनी जो घोटाळा केलाय त्याचे समर्थन शिवसेना कधीही करणार नाही. तुमच्यामुळे आमच्या 26 माता भगिनींचे कुंकू पुसले गेले आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एसटीत आता ब्लाईंड स्पॉट कॅमेरे लागणार, संपूर्ण 360 अंशातून निगराणी होणार एसटीत आता ब्लाईंड स्पॉट कॅमेरे लागणार, संपूर्ण 360 अंशातून निगराणी होणार
एसटी महामंडळाच्या नव्या  बसेस मध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी खास ब्लाइंड स्पॉट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे हे कॅमेरे 360 अंशातून निगराणी...
सोसाट्याचा वारा अन् तुफान सरी, मुंबईत पुन्हा पाऊस; लोकलच्या वेळापत्रकाचं काय?
“यै मौसम का जादू है मितवा…”, पावसात धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा छत्री घेऊन रेन डान्स
ऐश्वर्या नारकरांच्या मुलाचा एअरपोर्टवर खुल्लम खुल्ला रोमान्स; पहा व्हिडीओ
वडिलांचे अफेअर्स असूनही आई घटस्फोट का देत नाही? सूरज पांचोलीने सांगितलं खरं कारण
जेनिफर विंगेटने करण सिंह ग्रोवरला का दिला घटस्फोट? कारण वाचून तुम्हीही व्हाल चकीत!
Skin Care- चेहऱ्यावर साखर लावा, सुरकुत्या घालवा! वाचा सविस्तर