महाराष्ट्र हितासाठी कुणी एकत्र यायला तयार असेल तर त्यांना सोबत घेऊन लढू – आदित्य ठाकरे

महाराष्ट्र हितासाठी कुणी एकत्र यायला तयार असेल तर त्यांना सोबत घेऊन लढू – आदित्य ठाकरे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार, आदित्य ठाकरे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘महाराष्ट्र व मराठी हितासाठी कुणी एकत्र यायला तयार असेल तर त्यांना सोबत घेऊन लढू’, असे सांगितले आहे. मनसे-शिवसेना युतीबाबत प्रसारमाध्यमांनी विचारल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.

”आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिला आहे. आमची भावना हिच आहे की मराठी माणसाच्या हितासाठी, महाराष्ट्रासाठी जर कुणी एकत्र यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. काल परवाकडे दिपेश म्हात्रे आणि मनसेचे राजू पाटील यांनी एकत्र आंदोलन केलं आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहित आहे. आमचं मन साफ आहे. महाराष्ट्र हितासाठी कुठलाही पक्ष, कुठलाही नेता आमच्यासोबत यायला तयार असेल तर आम्ही एकत्र लढू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यात असलेले वाद, भांडणे ही अत्यंत क्षुल्लक आणि किरकोळ आहेत. त्यामुळे एकत्र येणे आणि एकत्र राहणे यात काही कठीण असल्याचे मला वाटत नाही, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत मांडली होती. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरेंसोबत असलेली किरकोळ भांडणे, वाद बाजूला ठेवून एकत्र काम करण्यास आपण तयार असल्याचे सूतोवाच केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Photo – चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची आकर्षक दृष्ये Photo – चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची आकर्षक दृष्ये
    पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जम्मू-कश्मीर दौऱ्यावरून असून त्यांनी 46 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांपैकी सर्वात महत्त्वाचा आणि मोठ्या
Cooking Tips- स्वयंपाक रुचकर, चविष्ट आणि पौष्टिक करायचंय, मग या टिप्स वापराच
RBI च्या रेपो रेटच्या घोषणेने शेअर बाजार वधारला; सेन्सेक्सचा 82000 तर निफ्टीचा 25000 चा टप्पा पार
प्रसिद्ध मल्याळम अभिनेता शाइन टॉम चाकोचा भीषण अपघात; वडिलांचा मृत्यू; आई, भावावर उपचार सुरू
राज्य सरकारची गाडी खिळखिळी झालेली आहे, संजय राऊत यांची टीका
कुंकवाचं झाड लावण्यापेक्षा संसदेत अधिवेशन बोलवा आणि प्रश्नांची उत्तरं द्या, संजय राऊत यांचा घणाघात
बकरी ईदला गोहत्या झाली तर रक्ताचे पाट वाहतील; उत्तर प्रदेशच्या मंत्र्याचे वादग्रस्त विधान