RCB Won IPL 2025 : अनुष्का शर्माची ‘ती’ गोष्ट विराटसाठी ठरली लकी ? आरसीबीच्या विजयामुळे अनुष्काही भावूक

RCB Won IPL 2025 :  अनुष्का शर्माची ‘ती’ गोष्ट विराटसाठी ठरली लकी ? आरसीबीच्या विजयामुळे अनुष्काही भावूक

Virat Kohli – Anushka Sharma : आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा पराभव करून 18 वर्षांचे स्वप्न पूर्ण केले आहे. विराटच्या संघाने पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकत इतिहास रचला आहे. सामना जिंकल्यानंतर विराट भावुक झाला. मैदानावर असतानाच त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि विजायनंतर तो चक्क मैदानावरच रडू लागला. त्याला पाहून अनेक चाहतेही भावूक झाले होते. मात्र आरसीबीच्या या विजयामुळे विराटची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा खूपच खुश होती, तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट झळकत होता. आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासून अनुष्का विराटचे बहुतेक सामने पाहण्यासाठी आली होती. अनुष्का ही विराटची लकी चार्म आहे. दरम्यान तिची ‘ही’ खास गोष्ट विराटसाठी अंतिम सामन्यात लकी ठरल्याचे बोलले जात आहे.

आयपीएलच्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये देखील अनुष्का शर्मा ही विराटला पाठिंबा देण्यासाठी गेली होती. पहिला क्वालिफायर सामना आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यातच खेळला गेला होता. त्या सामन्यात अनुष्काने जे काही केले, तेच तिने अंतिम सामन्यातही केले. अनुष्काचा एक शर्ट विराटसाठी लकी ठरला अशी चर्चा आहे.

व्हाईट शर्ट विराटसाठी लकी ?

आयपीएलच्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये अनुष्का शर्मा ही पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम घालून आली होती. ती स्टँडवरून विराटसाठी आणि आरसीबीसाठी चिअर करताना दिसली. तर काल (मंगळवारी) झालेल्या अंतिम सामन्यातही अनुष्काचा लूक असाच होता. कालही ती पांढरा शर्ट आणि डेनिम घालून आली होती. त्यामुळे अनुष्काचा पांढरा शर्ट विराटसाठी लकी ठरला असे बोलले जात आहे.

 

अनुष्काला मिठी मारून रडला विराट

काल आयपीएलची फायनल जिंकल्यावर विराट भरमैदानातच रडला होता. त्यानंतर नेहमीप्रमाणे अनुष्का विराटला भेटण्यासाठी मैदानात आली, तेव्हा त्याने तिला घट्ट मिठी मारली. अनुष्का विराटचे अभिनंद करत असतानाच विराटच्या डोळ्यात तेव्हाही अश्रू आले होते. एवढंच नव्हे तर आरसीबी जिंकल्यानंतर अनुष्काच्या डोळ्यातही अश्रू होते आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. हे आनंदाश्रू होते, यात काहीच दुमत नाही.

 

विराटने अनुष्कालाही दिलं क्रेडिट

काल सामान जिंकल्यानंतर विराट कोहलीने आरसीबीच्या विजयाचे श्रेय अनुष्का शर्माला दिले आहे. विराट म्हणाला – ती 2014 पासून येथे येत आहे आणि आरसीबीला पाठिंबा देत आहे, म्हणून तिलाही 11 वर्षे झाली आहेत. ती सतत तिथे होती. सामन्यांना यायची,कठीण मॅचही तिने पाहिल्या, तिने आम्हाला हरताना पाहिलंय. तुमचा जीवनसाथी तुमच्यासाठी खेळण्यासाठी काय- काय करत असतो, त्याग, कमिटमेंट देतो आणि अडचणीत तुमच्यासाठी उपस्थित असतो. हे असे काहीतरी आहे जे तुम्ही शब्दात मांडू शकत नाही.’ असं म्हणत विराटने अनुष्काचंही कौतुक केलं.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;