कराचीच्या मलीर तुरुंगातून 216 कैदी पळाले, भूकंपाच्या धक्क्यानंतर बॅरेकमधून काढल्याने साधली संधी

कराचीच्या मलीर तुरुंगातून 216 कैदी पळाले, भूकंपाच्या धक्क्यानंतर बॅरेकमधून काढल्याने साधली संधी

कराचीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर याचाच गैरफायदा घेत कराचीतील मलीर तुरुंगातून 216 कैदी पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भूकंपानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कैद्यांना बॅरेकमधून बाहेर काढण्यात आले होते. परंतु कैद्यांनी ही संधी साधून तुरुंगाच्या मुख्य गेटमधून पलायन केले. पळून गेलेल्या 216 पैकी 86 कैद्यांना पुन्हा पकडण्यात जेल प्रशासनाला यश आले आहे. परंतु बाकीचे कैदी अद्याप फरार आहेत. या वृत्ताला सिंध प्रांताचे गृहमंत्री झिया-उल-हसन लंजर यांनी मंगळवारी पहाटे पुष्टी दिली.

या घटनेनंतर लगेचच रेंजर्स आणि एफसीने तुरुंगाचा ताबा घेतला. तुरुंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पळालेल्या कैद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम अजूनही सुरू आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर एका कैद्याचा मृत्यू झाला आहे. तर चार सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राजकारण करा, इव्हेंट मॅनेजमेंट नको! राहुल गांधी यांचा मोदींवर जोरदार हल्ला राजकारण करा, इव्हेंट मॅनेजमेंट नको! राहुल गांधी यांचा मोदींवर जोरदार हल्ला
देशाची मंदावलेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला....
‘बीकेसी’च्या ‘सेबी’ कार्यालयात साप आणि अजगरांचा सुळसुळाट, एकाच ठिकाणी आढळली बारा पिल्ले
महायुतीच्या काळात भ्रष्टाचारी मोकाट, लाचखोर सरकारी बाबूंवर मुदतीत खटले भरण्यात टाळाटाळ
हिंदुस्थानकडून शस्त्रसंधी ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळेच! रशियाचाही अमेरिकी दाव्याला दुजोरा
ऐकावे ते नवलच! मोदींनी घरात लावले सिंदूरचे रोपटे
बंगळुरू चेंगराचेंगरी, पोलीस आयुक्तांसह 8 अधिकारी निलंबित; आरसीबीविरुद्ध गुन्हा
मुंबई ते नागपूर अवघ्या आठ तासांत, ‘समृद्धी’च्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण