यंदा एमबीबीएसच्या जागांमध्ये 400 ची भर; राज्यातील जागा 11 हजार 500 वर

यंदा एमबीबीएसच्या जागांमध्ये 400 ची भर; राज्यातील जागा 11 हजार 500 वर

मुंबई जिल्हा तिथे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या घोषणेला अनुसरून पालघर, जालना, वर्धा व हिंगोली या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात यंदापासून प्रवेश केले जाणार आहेत. त्यामुळे वैद्यकीयच्या जागांमध्ये यंदा प्रत्येकी 100 याप्रमाणे 400 जागांची भर पडेल. याशिवाय अहिल्यानगर येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय सुरू होणार आहे, मात्र या महाविद्यालयातील प्रवेशांकरिता पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत वाट पाहावी लागेल.

महाराष्ट्रात दहा जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची योजना होती. त्यानुसार गेल्या वर्षी गडचिरोली, वाशीम, अंबरनाथ, बुलढाणा, भंडारा, अमरावती जिल्ह्यांतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करण्यात आले. यंदा उर्वरित चार म्हणजे पालघर, जालना, वर्धा व हिंगोली येथे प्रवेश केले जाणार आहेत.

राज्यातील जागा 11 हजार 500 वर
याशिवाय यंदापासून सुरू होणारी चार नवीन महाविद्यालये आणि अहिल्यानगर येथील 430 खाटांचे आणि 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय धरून राज्यातील वैद्यकीय जागांची संख्या 11 हजार 500 वर जाण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फूड अ‍ॅलर्जी आहे की नाही कसे ओळखावे? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार फूड अ‍ॅलर्जी आहे की नाही कसे ओळखावे? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
आपल्यापैकी अनेकांना धुळीची, धुराची, तसेच पदार्थांची ॲलर्जी होत असते. त्यात असे अनेकजण आहेत जे वेगवेगळे खाद्यपदार्थ खाण्याचे शौकीन आहेत. अशातच...
वजन कमी करण्यासाठी ‘या’ 5 सवयी अंगीकारा, फक्त एका महिन्यात तुम्हाला दिसतील आश्चर्यकारक परिणाम
फक्त अंडीच नाही तर ‘या’ भाज्या देखील आहेत प्रथिनांचे मुबलक स्त्रोत
अपघाताची जबाबदारी रेल्वे टाळू शकत नाही; अजित पवार यांचे स्पष्ट मत
Skin Care – आंघोळीपूर्वी फक्त या 5 गोष्टी करा, तुमचा चेहरा ब्राइडल फेशियल केल्यासारखा चमकेल!
मोदी सरकारची 11 वर्ष म्हणजे फक्त प्रचार, मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातावरून राहुल गांधी यांची टीका
टेंभुर्णी- अकलूज मार्गावर दोन दुचाकींची धडक; तिघांचा मृत्यू, दोनजण जखमी