टेकऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड, एअर इंडियाच्या दिल्ली-कोलकाता विमानाचे उड्डाण रद्द
टेक ऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड आढळून आल्यानंतर सोमवारी दिल्ली-कोलकाता विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 160 प्रवाशांना घेऊन हे विमान कोलकाताला निघाले होते. एअरलाइन कंपनीने घटनेची पुष्टी केली आहे.
एअर इंडियाचे AI2403 हे विमान कोलकातासाठी उड्डाण घेण्याच्या तयारीत होते. मात्र टेकऑफ दरम्यान विमानात तांत्रिक बिघाड आढळून आल्यानंतर विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. त्यानंतर अनिवार्य सुरक्षा तपासणीसाठी हे विमान थांबवण्यात आले. विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List