Mumbai News – मुंबईत पावसाची मुसळधार, विमानसेवेला फटका; इंडिगो, स्पाइसजेटकडून अ‍ॅडव्हायजरी जारी

Mumbai News – मुंबईत पावसाची मुसळधार, विमानसेवेला फटका; इंडिगो, स्पाइसजेटकडून अ‍ॅडव्हायजरी जारी

आठवड्याची सुरवात मुसळधार पावसाने झाली असून यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सर्वत्र वाहतूक कोंडी झाली असून लोकल आणि विमानसेवेलाही याचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे विमानाच्या उड्डाणांना विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इंडिगो आणि स्पाइसजेटकडून अ‍ॅडव्हायजरी जारी केले आहे. विमान कंपन्यांनी प्रवाशांना त्यांच्या विमानाची स्थिती तपासण्याचा आणि गैरसोय टाळण्यासाठी विमानतळावर लवकर पोहोचण्याचा सल्ला दिला.

स्पाइसजेटने X वर निवेदन जारी केले. मुंबईतील खराब हवामानामुळे विमानाचे सर्व निर्गमन/आगमन आणि परिणामी त्यांच्या उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो, असे स्पाइसजेटने आपल्या निवेदनात म्हटले आहे. प्रवाशांना spicejet.com द्वारे त्यांच्या विमानाच्या स्थितीची तपासणी करण्याची विनंती एअरलाइनने केली आहे.

इंडिगोने देखील अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या अनेक मार्गांवर वाहतूक मंदावलेली दिसून येत आहे. जर तुम्ही आज विमान प्रवास करत असाल तर कृपया आगाऊ नियोजन करा, थोडे लवकर निघा आणि बाहेर पडण्यापूर्वी आमच्या अ‍ॅप किंवा वेबसाइटवर तुमच्या फ्लाइटची स्थिती तपासा, असा सल्ला इंडिगोने आपल्या अ‍ॅडव्हायजरीत दिला आहे.

मुंबई विमानतळाकडून एक्सवर अ‍ॅडव्हायजरी जारी करत फ्लाईट चुकू नये म्हणून वेळेआधीच विमानतळावर पोहोचण्याचे प्रवाशांना आवाहन केले आहे. दरम्यान, हवामान खात्याने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार तासांत मुंबई आणि मुंबई उपनगरातील काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की… Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
भारतात आयुर्वेदानुसार उपचार वैदिक काळापासून सुरु आहे. लोक पहिल्यापासून आरोग्याच्या समस्यांवर जडी-बुटींचा वापर करायचे.परंतू आता काळानुसार इंग्रजी औषधांवर अवलंबून आहेत....
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या
Ratnagiri News – चाकरमान्यांना बाप्पा पावला! 23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार रो-रो कार सेवा
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास तातडीने सुरू न झाल्यास, महाराष्ट्र बंद करू; जरांगे पाटील यांचा इशारा
टेकऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड, एअर इंडियाच्या दिल्ली-कोलकाता विमानाचे उड्डाण रद्द
माणिकराव कोकाटे यांचं वर्तन चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीस यांचं विधान