ठाणे ते कल्याण जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर, लोकांसाठी मात्र खड्डे; मिंधेंवर आदित्य ठाकरे बरसले

ठाणे ते कल्याण जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर, लोकांसाठी मात्र खड्डे; मिंधेंवर आदित्य ठाकरे बरसले

“गद्दार उपमुख्यमंत्री ठाण्यातून कल्याणला जाण्यासाठीही आता हेलिकॉप्टर वापरायला लागले आहेत. एवढ्या अंतरासाठी स्वतःसाठी हेलिकॉप्टर आहे, पण लोकांसाठी खड्डे आहेत”, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली आहे.

कल्याण शिळरोडवरील नवीन पलावा पुलाचे उद्घाटन करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. पलावा पुल उद्घाटनानंतर काही वेळातच बंद करण्यात आला. यावरच आपली प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “पालावाच्या येथील जो रास्ता आहे, त्याची आताची आणि आधीची परिस्थिती बघा. आताच्या पुलाची परिस्थितीही बघा. पर्वा मी ऐकलं, जे गद्दार उपमुख्यमंत्री आहेत ते ठाण्यातून कल्याणला जाण्यासाठीही आता हेलिकॉप्टर वापरायला लागले आहेत. राजू पाटील यांनी ट्वीट केलं होतं. एवढ्या अंतरासाठी स्वतःसाठी हेलिकॉप्टर आहे, पण लोकांसाठी खड्डे आहेत. कुठच्या खात्याने हे बनवलं आहे. मुंबई, पुण्याच्या रस्त्यांचे हाल पाहा, समृद्धी महामार्ग पाहा, सगळ्या ठिकाणी बेकार खड्डे झाले आहेत. यात राजकरण जरी बाजूला ठेवलं तरी, तुम्ही मुंबईत कुठलाही महामार्ग घ्या, मुंबई आणि महाराष्ट्रात एवढं भयानक केलेलं आहे. कारण भ्रष्टनाथाने त्यात पैसे काढले आहेत.”

मराठी लोक उत्तर भारतीयांच्या पैश्यांवर जगतात अशा शब्दात भाजप खासदार निशिकांत दुबे बरळले होते. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “निशिकांत दुबे हे उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिकांचे प्रतिनिधी नाही. ते भाजपचे खासदार आहेत. यातून भाजपचे महाराष्ट्राबद्दल द्वेष स्पष्ट होतं. पण दुसऱ्या बाजूला याच निशिकांत दुबे यांना बिहार निवडणुकीची जाबाबदारी देण्यात आली आहे. भाजपची जी नीती आहे, तोडा-फोडा राज्य करा. दोन समाजात, जातीत वाद निर्माण करा आणि स्वतःची पोळी भाजा, हे प्रकार आता समोर आले आहेत. मराठी, महाराष्ट्र आणि बिहार येथील प्रत्येक माणसाने हे पाहवं की, हे भाजपवाले दोन समाजात कशी आग लावतात, खोटं बोलतात आणि निवडणुकीत जिकंण्याचा प्रयत्न करतात. हे आता स्पष्ट होतं चाललं आहे की, भाजप बिहारमध्ये जिंकू शकत नाही. तिथे निवडणूक आयोगाने जे आता रिव्हिजन चालू केलं आहे. मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षणाचा जो विषय आहे, तो आता सुप्रीम कोर्टात गेलेला आहे. यांचं हेच आहे की, भांडणे लावायची, खोटं बोलायचं, विष ओकायचं आणि मग निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करायचा, हे भाजपचं राजकरण आम्ही चालू देणार नाही.”

आदित्य ठाकरे म्हणाले, “इकबाल मिरची याच्यासोबत ज्यांनी व्यवसाय केला ते भाजपमध्ये आहेत. सलीम कुत्तासोबत जे नाचले, ते त्यांच्या पक्षात आहेत. कदाचित दाऊद देखील त्यांच्याच पक्षातील असतील. कारण पहलगामचे अतिरेकी गेले कुठे? याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. कदाचित भाजपमध्ये त्यांनी प्रवेश घेतला असेल आणि भाजप त्यांना कॅबिनेट मंत्री देखील बनू शकतं.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना अग्रमानांकन; राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना अग्रमानांकन; राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना योनेक्स सनराईज राज्यस्तरीय 15 व 17 वर्षांखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अग्रमानांकन...
सतेज, राजमाता जिजाऊ संघांना विजेतेपद
बंगाली भाषेवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, भाषेच्या वादावरून ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या
प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि राणा दग्गुबती यांना ईडीने बजावले समन्स; काय आहे प्रकरण?
Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या