वकिलांना नोटीस बजावणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन; सर्वोच्च न्यायालायने ईडीला पुन्हा फटकारले

वकिलांना नोटीस बजावणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन; सर्वोच्च न्यायालायने ईडीला पुन्हा फटकारले

जेष्ठ वकील अरविंद दातार आणि प्रताप वेणुगोपाल यांना ईडीने पाठवलेल्या समन्सच्या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने ईडीला पुन्हा फटकारले आहे. याआधी न्यायालयाने ईडीच्या होत असलेल्या राजकीय वापरावरून चांगलीच खरडपट्टी केली आहे. वकिलांना ईडीने पाठवलेल्या नोटीसवर सर्वोच्च न्यायालयाने नापसंती दर्शवली आहे. वकील आणि त्यांचा अशील यांच्यातील संवाद हा खासगी आणि गोपनीय असतो, तसेच तो विशेषाधिकार आहे. त्यावर अशा प्रकारे वकिलांना समन्स बजावणे योग्य आहे का? असा सवाल सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने उपस्थित केला. तसेच वकिलांना समन्स बजावणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

सरन्यायाधीश गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने याप्रकरणात सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. वकिलांमध्ये आणि त्यांच्या अशीलामधील संवाद गुप्त राखणे त्यांचा विषेशाधिकार आहे. असे असताना ईडीने संबंधित वकिलांना नोटीस कशी पाठवली असा प्रश्न न्यायालयाने विचारला. अशा प्रकारे समन्स देणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन असल्याचंही न्यायालयाने म्हटलंय. अ‍ॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी न्यायालयात सांगितले की, ईडीने जे केले ते चुकीचे होते.

ईडीने रिलिगेअर एन्टरप्रायझेसच्या माजी अध्यक्षा रश्मी सलुजा यांना 250 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या ESOP (Employee Stock Option Plans) देण्याच्या प्रकरणात तपासादरम्यान हे समन्स बजावले होते. अरविंद दातार यांनी या ESOPs बाबत कायदेशीर मत दिले होते आणि प्रताप वेणुगोपाल हे अ‍ॅडव्होकेट-ऑन-रिकॉर्ड होते. देशभरातील बार असोसिएशन्सकडून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर ईडीने नोटिस मागे घेतली. तसेच सर्व फील्ड अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या वकिलांना नोटिस देण्यास मनाई करणारे परिपत्रक जारी केले. आता कोणत्याही विशेष परिस्थितीत नोटिस द्यायची असल्यास ED डायरेक्टरची मंजुरी आवश्यक ठरवण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की… Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
भारतात आयुर्वेदानुसार उपचार वैदिक काळापासून सुरु आहे. लोक पहिल्यापासून आरोग्याच्या समस्यांवर जडी-बुटींचा वापर करायचे.परंतू आता काळानुसार इंग्रजी औषधांवर अवलंबून आहेत....
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या
Ratnagiri News – चाकरमान्यांना बाप्पा पावला! 23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार रो-रो कार सेवा
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास तातडीने सुरू न झाल्यास, महाराष्ट्र बंद करू; जरांगे पाटील यांचा इशारा
टेकऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड, एअर इंडियाच्या दिल्ली-कोलकाता विमानाचे उड्डाण रद्द
माणिकराव कोकाटे यांचं वर्तन चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीस यांचं विधान