माणिकराव कोकाटे यांचं वर्तन चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीस यांचं विधान

माणिकराव कोकाटे यांचं वर्तन चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीस यांचं विधान

माणिकराव कोकाटे यांचं वर्तन चुकीचं होतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. पावसाळी अधिवेशनात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे भर विधान परिषदेत मोबाईलवर जंगली रमी खेळण्यात रमले होते. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकाराबद्दल कृषिमंत्र्यांवर चारही बाजूने टीका होत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे.

याप्रकरणी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, “विधानसभेत ज्यावेळी चर्चा चालते, तेव्हा आपलं कामकाज नसलं तरीही, त्याठिकाणी गंभीरपणे बसणं गरजेचं आहे. साधारपणे एखाद्या वेळी असं होतं की, तुम्ही कागदपत्रे वाचता, इतर गोष्टी वाचता. पण रमी खेळतानाचा व्हिडीओ हा निश्चित योग्य नाही. त्यांनी त्या ठिकाणी खुलासा दिला आहे की, मी रमी खेळत नव्हतो. अचानक ती पॉपअप झाली. त्यांनी जरी असं सांगितलं असलं तरी, एकूण जे घडलं आहे, ते आम्हाला भूषणावह नाही.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बंगाली भाषेवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, भाषेच्या वादावरून ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या बंगाली भाषेवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, भाषेच्या वादावरून ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या
तृणमूल काँग्रेसने सोमवारी पश्चिम बंगालमध्ये ‘शहीद दिवस’ रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ते लोकसभा खासदार अभिषेक...
प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि राणा दग्गुबती यांना ईडीने बजावले समन्स; काय आहे प्रकरण?
Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या
Ratnagiri News – चाकरमान्यांना बाप्पा पावला! 23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार रो-रो कार सेवा
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास तातडीने सुरू न झाल्यास, महाराष्ट्र बंद करू; जरांगे पाटील यांचा इशारा