गरिबी वाढतेय, मोजक्याच धनदांडग्यांच्या हाती पैसा; गडकरींनी ‘सब का विकास’ उघडा पाडला

गरिबी वाढतेय, मोजक्याच धनदांडग्यांच्या हाती पैसा; गडकरींनी ‘सब का विकास’ उघडा पाडला

देशात गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढत चालली असल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशात गरीबांची संख्या वाढतेय आणि पैसा व संपत्ती मात्र काही मोजक्या श्रीमंतांच्याच हाती एकवटली आहे, असे जळजळीत वास्तव त्यांनी मांडले.

नागपूरमध्ये सीएच्या विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये बोलताना नितीन गडकरी यांनी देशातील गरीब हळूहळू वाढत चालले आहेत आणि देशातील संपत्तीचे श्रीमंतांकडे केंद्रीकरण होत आहे, असे सांगितले. अर्थव्यवस्थेचे असे केंद्रीकरण होणे योग्य नाही, संपत्तीचे विकेंद्रीकरण व्हायला हवे, अशी सडेतोड भूमिकाही त्यांनी मांडली.

जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्र 22-24 टक्के तर सेवा क्षेत्राचे 52-54 टक्के योगदान आहे. 65 ते 70 टक्के ग्रामीण लोकसंख्या शेती करत असतानाही कृषी क्षेत्राचे जीडीपीमध्ये फक्त 12 टक्के योगदान असल्याचे ते म्हणाले.

गरीबांची गरिबी दूर करणारा, तरुणांसाठी रोजगार निर्मिती करणारा आणि देशाची संपत्ती वाढवणारा आर्थिक पर्याय आता हिंदुस्थानला हवा आहे.त्यासाठीच नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी उदारमतवादी अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना अग्रमानांकन; राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना अग्रमानांकन; राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना योनेक्स सनराईज राज्यस्तरीय 15 व 17 वर्षांखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अग्रमानांकन...
सतेज, राजमाता जिजाऊ संघांना विजेतेपद
बंगाली भाषेवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, भाषेच्या वादावरून ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या
प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि राणा दग्गुबती यांना ईडीने बजावले समन्स; काय आहे प्रकरण?
Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या