लातूरमध्ये मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेतला, कृषिमंत्र्यांवर कारवाई कधी? रोहित पवार यांचा सवाल

लातूरमध्ये मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेतला, कृषिमंत्र्यांवर कारवाई कधी? रोहित पवार यांचा सवाल

रविवारी लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे नेते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. यानंतर त्यांना राजीनामा देण्यास सगण्यात आलं आहे. यातच मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेतला, मात्र विधानपरिषदेत मोबाईलवर रमी खेळतानारे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर करवून कधी होणार? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे.

X वर एक पोस्ट करत रोहित पवार म्हणाले आहेत की, “लातूर येथे मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेतला असला तरी ज्या पत्त्यांच्या खेळामुळे हा गोंधळ झाला आहे, तो खेळ खेळणाऱ्या मंत्र्यांवर आधी कारवाई होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची महाराष्ट्र वाट पाहत आहे, राज्यकर्ते लोकभावनेचा आदर राखतील, ही अपेक्षा.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की… Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
भारतात आयुर्वेदानुसार उपचार वैदिक काळापासून सुरु आहे. लोक पहिल्यापासून आरोग्याच्या समस्यांवर जडी-बुटींचा वापर करायचे.परंतू आता काळानुसार इंग्रजी औषधांवर अवलंबून आहेत....
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या
Ratnagiri News – चाकरमान्यांना बाप्पा पावला! 23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार रो-रो कार सेवा
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास तातडीने सुरू न झाल्यास, महाराष्ट्र बंद करू; जरांगे पाटील यांचा इशारा
टेकऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड, एअर इंडियाच्या दिल्ली-कोलकाता विमानाचे उड्डाण रद्द
माणिकराव कोकाटे यांचं वर्तन चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीस यांचं विधान