ना पकडले, ना मारले; पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी गेले कुठे? विरोधकांनी मोदी सरकारला घेरले, संसदेत गोंधळ

ना पकडले, ना मारले; पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी गेले कुठे? विरोधकांनी मोदी सरकारला घेरले, संसदेत गोंधळ

 

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी विरोधकांनी पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, हिंदुस्थान पाकिस्तान युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले दावे आणि अहमदाबाद विमान दुर्घटना या मुद्द्यावरून केंद्र सरकारला कोंडीत पकडले. पहलगाम हल्ल्याला 3 महिने होत आले तरीही अद्याप दहशतवाद्यांना पकडण्यात यश आलेले नाही, असे म्हणत काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत मोदी सरकारवर हल्ला चढवला. यानंतर एकच गदारोळ सुरू झाला आणि राज्यसभेचे कामकाज सभापती जगदीप धनखड यांनी 12 वाजेपर्यंत तहकूब केले.

राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पहलगाम हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी आपण 267 अंतर्गत चर्चा करण्याची नोटीस दिल्याचेही म्हटले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ला 22 एप्रिल रोजी झाला. आतापर्यंत दहशतवादी पकडण्यात आलेले नाही किंवा त्यांचा खात्माही करण्यात आलेला नाही. जम्मू काश्मिरच्या नायब राज्यपालांनी हा हल्ला गुप्तचर विभागाचे अपयश असल्याची कबुली दिली आहे. सरकारने विरोधकांना याबाबत अवगत करावे, अशी मागणी केली

डोनाल्ड ट्रम्प यांनी 24 वेळा सांगितले की, माझ्या मध्यस्थी नंतर हिंदुस्थान पाकिस्तान युद्ध थांबले. हे देशासाठी अपमानजनक आहे. सरकारने या सर्व प्रश्नांची उत्तरे विरोधकांना द्यायला हवीत, असा हल्लाबोल खरगे यांनी केला. यानंतर जेपी नड्डा यांनी आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले. तसेच स्वातंत्र्यानंतर असा ऑपरेशन सिंदूर सारखी कारवाई कधी झाली नाही असेही म्हटले.

दरम्यान, लोकसभेमध्येही याच मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याने विरोधकांनी घोषणाबाजीही केली. त्याआधी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करू असे म्हटले होते. मात्र विरोधकांचे समाधान झाले नाही आणि लोकसभेत गोंधळ सुरूच राहिला. त्यामुळे लोकसभा 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की… Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
भारतात आयुर्वेदानुसार उपचार वैदिक काळापासून सुरु आहे. लोक पहिल्यापासून आरोग्याच्या समस्यांवर जडी-बुटींचा वापर करायचे.परंतू आता काळानुसार इंग्रजी औषधांवर अवलंबून आहेत....
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या
Ratnagiri News – चाकरमान्यांना बाप्पा पावला! 23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार रो-रो कार सेवा
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास तातडीने सुरू न झाल्यास, महाराष्ट्र बंद करू; जरांगे पाटील यांचा इशारा
टेकऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड, एअर इंडियाच्या दिल्ली-कोलकाता विमानाचे उड्डाण रद्द
माणिकराव कोकाटे यांचं वर्तन चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीस यांचं विधान