अजित दादांची शिस्त ही माज दाखवणाऱ्यांना ‘समज’ देण्यापूर्तीच आहे का? अंबादास दानवे यांचा सवाल

अजित दादांची शिस्त ही माज दाखवणाऱ्यांना ‘समज’ देण्यापूर्तीच आहे का? अंबादास दानवे यांचा सवाल

पावसाळी अधिवेशनात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते फेकणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या घटनेला 12 तास उलटल्यानंतरही मारहाण करणारा अजित पवार गटाचा कार्यकर्ता सूरज चव्हाण याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. त्यावरून शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.

”सत्ता आणि माज, हे आज समानार्थी शब्द होऊन बसले आहेत. याचा ढळढळीत पुरावा म्हणजे कालची सुरज चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली मारहाण. अजित पवार तसे शिस्तीचे नेते म्हणून ओळखले जातात. पण ही शिस्त हा माज दाखवणाऱ्यांना ‘समज’ देण्यापूर्तीच आहे का, असा सवाल उभा राहतो. ऑनलाईन रम्मी खेळा किंवा मारहाण करा, त्यावर फक्त ‘समज’ देणे एवढेच सध्या अजितदादा करत आहेत”, असे दानवे यांनी ट्विट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रविवारी लातूरला आले होते. शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी ते बोलत असताना अचानक छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी . कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्यांना घरी बसवा आणि पत्ते खेळायला द्या, असे म्हणत तटकरे यांच्यासमोर टेबलावर पत्ते फेकले. थोड्या वेळाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, छावाचे कार्यकर्ते बसलेल्या खोलीत आले आणि त्यांनी जोरदार मारहाण सुरू केली. दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने असल्याने त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की… Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
भारतात आयुर्वेदानुसार उपचार वैदिक काळापासून सुरु आहे. लोक पहिल्यापासून आरोग्याच्या समस्यांवर जडी-बुटींचा वापर करायचे.परंतू आता काळानुसार इंग्रजी औषधांवर अवलंबून आहेत....
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या
Ratnagiri News – चाकरमान्यांना बाप्पा पावला! 23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार रो-रो कार सेवा
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास तातडीने सुरू न झाल्यास, महाराष्ट्र बंद करू; जरांगे पाटील यांचा इशारा
टेकऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड, एअर इंडियाच्या दिल्ली-कोलकाता विमानाचे उड्डाण रद्द
माणिकराव कोकाटे यांचं वर्तन चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीस यांचं विधान