…मग शिक्षकांनी शिकवायचे कधी? बी. एल.ओ. कामातून शिक्षकांना मुक्त करा; महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

…मग शिक्षकांनी शिकवायचे कधी? बी. एल.ओ. कामातून शिक्षकांना मुक्त करा; महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

प्राथमिक शिक्षकांना बी.एल.ओ. कामातून मुक्त करावे या मागणीचे निवेदन सोमवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.शिक्षकांवर वारंवार अशैक्षणिक कामाची जबाबदारी टाकली जात असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकावायचं कधी? प्रश्न विचारला जात आहे.

संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी 22 फेब्रुवारी 2005 रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना दिलेल्या आदेशानुसार, प्राथमिक शिक्षकांची अशैक्षणिक कामासाठी नियुक्ती करू नये असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्राथमिक वर्गांतील शिक्षकांकरिता विद्यार्थ्यांप्रमाणे 30 शिक्षक संख्या निश्चित करण्यात आलेली आहे.

अशैक्षणिक कामांसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक वर्गातील शिक्षकांची किमान 200 दिवस आणि उच्च प्राथमिक वर्गांतील किमान 220 दिवस अध्यापन होणे बंधनकारक आहे. जेणेकरून मुलांना गुणवत्तेचे व दर्जेदार शिक्षण मिळेल. प्राथमिक शिक्षकांना मतदान नोंदणी, मतदार यादी दुरुस्ती, जनगणना, निवडणूक कामे, बालकांचे शालेय नोंदणी शिक्षण क्रिडा स्पर्धा मिळून 23 प्रकारची कामे करावी लागतात. यामध्ये नियुक्ती झालेल्या शिक्षकांवर ही कामे लादण्यात येत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता अशैक्षणिक कामातून प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी राज्यकार्याध्यक्ष संतोष कदम,रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अजय गराटे,सत्यजित पाटील, दिलीप तारवे, संतोष रावणंग,मनेष शिंदे, अशोक सुर्वे, रवींद्र कुळये, राजेश सोहनी,मंगेश मोरे, नानासाहेब गोरड,मनोजकुमार खानविलकर, निलेश देवकर,सतीश मुणगेकर,महेंद्र रेडेकर, उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की… Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
भारतात आयुर्वेदानुसार उपचार वैदिक काळापासून सुरु आहे. लोक पहिल्यापासून आरोग्याच्या समस्यांवर जडी-बुटींचा वापर करायचे.परंतू आता काळानुसार इंग्रजी औषधांवर अवलंबून आहेत....
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या
Ratnagiri News – चाकरमान्यांना बाप्पा पावला! 23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार रो-रो कार सेवा
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास तातडीने सुरू न झाल्यास, महाराष्ट्र बंद करू; जरांगे पाटील यांचा इशारा
टेकऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड, एअर इंडियाच्या दिल्ली-कोलकाता विमानाचे उड्डाण रद्द
माणिकराव कोकाटे यांचं वर्तन चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीस यांचं विधान