IND vs ENG – चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, प्रमुख अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर

IND vs ENG – चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, प्रमुख अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला यजमान संघाने जिंकला, तर दुसरा सामना हिंदुस्थानने जिंकला होता. त्यानंतर झालेल्या लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने विजय मिळवत मालिकेत 2-1 आघाडी घेतली. त्यामुळे मॅनचेस्टर येथे होणाऱ्या चौथ्या लढतीत विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न हिंदुस्थानचा असणार आहे. मात्र या लढतीपूर्वी हिंदुस्थानच्या संघाला मोठा धक्का बसला असून प्रमुख अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे.

हिंदुस्थानचा स्टार अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याला मोठी दुखापत झाली आहे. जीममध्ये व्यायाम करत असताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे तो 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी लढतीत खेळू शकणार नाही. एवढेच नाही तर तो पुढील सामनाही खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

IND vs ENG Test – तीन विक्रमांवर शुभमन गिलची नजर

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की… Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
भारतात आयुर्वेदानुसार उपचार वैदिक काळापासून सुरु आहे. लोक पहिल्यापासून आरोग्याच्या समस्यांवर जडी-बुटींचा वापर करायचे.परंतू आता काळानुसार इंग्रजी औषधांवर अवलंबून आहेत....
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या
Ratnagiri News – चाकरमान्यांना बाप्पा पावला! 23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार रो-रो कार सेवा
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास तातडीने सुरू न झाल्यास, महाराष्ट्र बंद करू; जरांगे पाटील यांचा इशारा
टेकऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड, एअर इंडियाच्या दिल्ली-कोलकाता विमानाचे उड्डाण रद्द
माणिकराव कोकाटे यांचं वर्तन चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीस यांचं विधान