पैसे परत न दिल्याने लेहंगा चाकूने टराटरा फाडला, कल्याणमधील घटना; कामगारांना धमकावणाऱ्या तरुणाला अटक

पैसे परत न दिल्याने लेहंगा चाकूने टराटरा फाडला, कल्याणमधील घटना; कामगारांना धमकावणाऱ्या तरुणाला अटक

कल्याणातील नामांकित दुकानातून खरेदी केलेला 30 हजार रुपये किमतीचा लग्नाचा लेहंगा घरच्यांना पसंत न पडल्याने तो परत करून पैसे देण्याची मागणी तरुणीने केली. मात्र पैसे परत देण्यास नकार दिल्याच्या रागातून तरुणीच्या संतापलेल्या मित्राने दुकानातच गोंधळ घालत चाकूने लेहंगा टराटरा फाडला. इतकेच नव्हे तर कामगारांना मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर मॅनेजर प्रवीण समाता यांनी बाजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेताच पोलिसांनी सुमित सयानी याला अटक केली.

कल्याणच्या लालचौकी परिसरात
असलेल्या कपड्याच्या कलाक्षेत्र दुकानातून एका तरुणीने लग्नासाठी 32 हजार 300 रुपयांचा लेहंगा खरेदी केला होता. मात्र हा लेहंगा घरच्यांना पसंत न पडल्याने दुपारी ती लेहंगा परत करण्यासाठी दुकानात आली. मात्र आपल्याला पैसे परत केले जात नसून त्या किमतीची दुसरी वस्तू खरेदी करण्याचा सल्ला दुकानदाराने दिला. मात्र दुकानात दुसरी पसंतीची वस्तू न मिळाल्याने ऑगस्ट महिन्यात नवा स्टॉक आल्यानंतर खरेदी करण्याचे मान्य करत ती निघून गेली.

ठार मारण्याची धमकी
पैसे परत न केल्याने संतापलेल्या सुमित याने संध्याकाळी दुकानात येत गोंधळ घाल त पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र में नेजरने पैसे परत देता येत नसल्याचे सांगताच संतापलेल्या सुमित याने खिशातून चाकू काढून तरुणीने परत केलेला लेहंगा फाडून कामगारांना मारण्याची धमकी दिली. यानंतर घाबरलेल्या दुकानच्या मॅनेजरने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की… Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
भारतात आयुर्वेदानुसार उपचार वैदिक काळापासून सुरु आहे. लोक पहिल्यापासून आरोग्याच्या समस्यांवर जडी-बुटींचा वापर करायचे.परंतू आता काळानुसार इंग्रजी औषधांवर अवलंबून आहेत....
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या
Ratnagiri News – चाकरमान्यांना बाप्पा पावला! 23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार रो-रो कार सेवा
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास तातडीने सुरू न झाल्यास, महाराष्ट्र बंद करू; जरांगे पाटील यांचा इशारा
टेकऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड, एअर इंडियाच्या दिल्ली-कोलकाता विमानाचे उड्डाण रद्द
माणिकराव कोकाटे यांचं वर्तन चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीस यांचं विधान