Mumbai News – घरगुती वाद टोकाला गेला, पत्नीला संपवत पतीचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

Mumbai News – घरगुती वाद टोकाला गेला, पत्नीला संपवत पतीचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

दहिसरमध्ये घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दहिसरमधील गणपत पाटील नगर येथे ही घटना घडली. पप्पू मनु राठोड असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पतीला अटक केली आहे.

पप्पू हा रोजंदारीवर काम करतो. पप्पूचा पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता. अखेर शनिवारी हा वाद विकोपाला गेला आणि पप्पूने आधी ग्राइंडिंग मशिनने पत्नीच्या डोक्यात वार केले. मग गळा दाबून पत्नीची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर पप्पूने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा कबुल केला. यानंतर पोलिसांनी पप्पूच्या घरी धाव घेतली.

पोलिसांनी घरी दाखल होत बेशुद्धावस्थेतील पीडितेला तात्काळ रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. नातेवाईक आणि शेजाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की… Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
भारतात आयुर्वेदानुसार उपचार वैदिक काळापासून सुरु आहे. लोक पहिल्यापासून आरोग्याच्या समस्यांवर जडी-बुटींचा वापर करायचे.परंतू आता काळानुसार इंग्रजी औषधांवर अवलंबून आहेत....
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या
Ratnagiri News – चाकरमान्यांना बाप्पा पावला! 23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार रो-रो कार सेवा
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास तातडीने सुरू न झाल्यास, महाराष्ट्र बंद करू; जरांगे पाटील यांचा इशारा
टेकऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड, एअर इंडियाच्या दिल्ली-कोलकाता विमानाचे उड्डाण रद्द
माणिकराव कोकाटे यांचं वर्तन चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीस यांचं विधान