माळशेज घाट ढासळू लागला, धोकादायक दरडी सोडून भलत्याच ठिकाणी संरक्षक जाळ्या ठोकल्या

माळशेज घाट ढासळू लागला, धोकादायक दरडी सोडून भलत्याच ठिकाणी संरक्षक जाळ्या ठोकल्या

2012 मध्ये भगवानगड बस दरीत कोसळून माळशेज घाटात 32 जणांचा बळी गेला होता. मात्र त्यानंतरही सुरक्षेच्या नावाने बोंबच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या घाटात धोकादायक दरडी सोडून भलत्याच ठिकाणी संरक्षक जाळ्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यामुळे धो धो पावसात दरडी कोसळत असून भयंकर अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.

सावर्णेपासून एमटीडीसी जुन्नर हा 14 किमीचा रस्ता कल्याण-माळशेज घाटातून जातो. या रस्त्यावर वाहनचाल करताना पावसाळ्यात खड्ड्यातून वाट चुकवत कसरत करावी लागते, जागोजागी संरक्षण जाळ्या जीर्ण झाल्या असून काही कोसळल्या आहेत, पावसाळ्यात तसेच रात्री दाट धुक्यात रस्ता समजावा म्हणून पांढरे पट्टेदेखील मारले गेले नाहीत. त्यामुळे नेहमीच अपघात घडत आहेत. रस्त्याच्या कडेला झाडेझुडपे वाढल्याने वाट दिसत नाही, त्यातच दिशादर्शक फलक गायब असल्याने धोक्याची वळणे समजत नाहीत. असे असताना नको त्या ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्याने धोकादायक ठिकाणाचे दगड, ढिगारे कोसळून वाहतूककोंडी होते. याबाबत वाहनचालकांनी अनेकदा आवाज उठवूनही बांधकाम खात्याचे अधिकारी कानाडोळा करत असून 2012 सारखा पुन्हा मोठा अपघात घडल्यानंतर सरकारला जाग येणार का? असा सवाल केला जात आहे.

सायंकाळी सहानंतर प्रवास टाळा

15 जुलै रोजी घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला होता. मात्र असे धोकादायक हॉटस्पॉट अनेक ठिकाणी असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे सायंकाळी सहानंतर शक्यतो प्रवास टाळावा अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग पोलीस विभागाकडून देण्यात येत आहे. प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी खबरदारी घेण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पायाखाली उशी ठेवून झोपण्याचे फायदे, शरीरासाठी ते किती फायदेशीर? घ्या जाणून पायाखाली उशी ठेवून झोपण्याचे फायदे, शरीरासाठी ते किती फायदेशीर? घ्या जाणून
आजच्या धावपळीच्या जीवनात बहुतेक लोकांना पाठदुखी, थकवा किंवा पाठीच्या कण्याच्या समस्यांचा त्रास होतो. बऱ्याचदा आपण महागडी औषधे किंवा उपचार घेतो,...
अहमदाबाद एअर इंडिया अपघाताबाबत मोठा खुलासा; कॅप्टननेच विमानाच्या इंजिनचे इंधन केले बंद
Nashik Accident – मुलाचा वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; लहान बाळासह 7 जणांचा मृत्यू
इराकमधील एका शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, 50 जणांचा आगीत होरपळून मृत्यू
Bengaluru Stampede – चेंगराचेंगरीला RCB जबाबदार; कर्नाटक सरकारने हायकोर्टात सादर केला अहवाल, कोहलीचाही उल्लेख
महाराष्ट्राप्रमाणेच बिहारची निवडणूक देखील हायजॅक करायचा प्रयत्न सुरू आहे – संजय राऊत
शुगर फ्री खीर, ग्रील्ड चिकन, नाचणी बाजरी इडली… संसदेच्या कॅन्टीनमध्ये आता खासदारांना मिळणार पौष्टीक पदार्थ