Nashik Accident – मुलाचा वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; लहान बाळासह 7 जणांचा मृत्यू

Nashik Accident – मुलाचा वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; लहान बाळासह 7 जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील नाशिक-वणी मार्गावर बुधवारी रात्री भीषण अपघात झाला. दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समिती समोर दुचाकी आणि चारचाकीत समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर कार रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या नाल्यामध्ये कोसळली. यात सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक वर्षाच्या बाळासह तीन महिलांचा आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी येथील एक कुटुंब मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नाशिक येथे आले होते. वाढदिवस साजरा करून घरी परतत असताना रात्री एकच्या सुमारास गाडीचा अपघात झाला. दुचाकीला धडकल्यानंतर कार रस्त्याच्या जवळील नाल्यामध्ये पडला. अपघातानंतर कारचे दरवाजा लॉक झाल्याने कुणालाही बाहेर पडता आले नाही. यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

देविदास पंडित गांगुर्डे (वय – 28), मनीषा देविदास गांगुर्डे (वय – 23), उत्तम एकनाथ जाधव (वय – 42), अलका उत्तम जाधव (वय – 38), दत्तात्रेय नामदेव वाघमारे (वय – 45), अनुसया दत्तात्रय वाघमारे (वय – 40) आणि भावेश देविदास गांगुर्डे (वय – 2) अशी मृतांची नावे आहेत. तर मंगेश यशवंद कुरघडे (वय – 25) आणि अजय जगन्नाथ गोंद (वय – 1 वर्ष) अशी जखमींची नावे असून त्यांना उपचारांसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकुळ, महाराष्ट्र 20 टक्के कमिशनचे राज्य झाले आहे – विजय वडेट्टीवार राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकुळ, महाराष्ट्र 20 टक्के कमिशनचे राज्य झाले आहे – विजय वडेट्टीवार
पुण्यात कोयत्या गँगने धुमाकुळ घातला होता, पण दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची टॉवेल बनियन गँग आता कार्यरत झाली आहे. त्यांच्या मनासारखे नाही झाले...
सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप
विधानभवनाच्या लॉबीत राडा, गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; मलाच मारण्यासाठी आले होते, आव्हाडांचा आरोप
Ratnagiri News – एसटी आणि मिनी बसचा भीषण अपघात, 34 प्रवासी जखमी
‘या’ लक्षणांवरून ओळखा आतड्यांचे आरोग्य बिघडलं, सुधारण्यासाठी करा हे उपाय
Video – ही जर का परिस्थिती राज्याची आली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय?
ही जर का परिस्थिती राज्याची आली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय? विधिमंडळातील राड्यावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला घेरले