Nanded News – जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी राजीनामा द्यावा, पहलगाम हल्ल्यावरून ओवेसी यांची मागणी

Nanded News – जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी राजीनामा द्यावा, पहलगाम हल्ल्यावरून ओवेसी यांची मागणी

जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी पहलगाम हल्यात सुरक्षा व्यवस्थेत चूक झाली हे मान्य केले. असे असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. कडक सुरक्षा व्यवस्था असताना त्याठिकाणी आतंकवादी पोहचले कसे? असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारला केला असून याला जबाबदार कोण? असा प्रतिसवालही त्यांनी केला आहे.

एका न्यायालयीन प्रकरणात वॉरंट आल्याने असदुद्दीन ओवेसी हे बुधवारी (16 जून 2025) सकाळी नांदेडला आले होते. परवानगी शिवाय सभा घेतल्याबद्दल निवडणुकीत त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर वॉरंट जारी करण्यात आले होते. आज न्यायालयात हजर राहून त्यांनी जामीन मिळवला. यानंतर पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, कश्मीरमध्ये पहलगामला झालेला हल्ला संतापजनक असून सुरक्षा व्यवस्था असताना आतंकवादी तेथे पोहचले कसे, असा प्रश्न त्यांनी विचारला. बिहार राज्यात निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांचे नागरिकत्व तपासण्याची मोहिम सुरू झाली असून ही बाब संतापजनक आहे. यासाठी दिलेला अवधी अत्यंत कमी असून अन्य राज्यात काम करणार्‍यांना, बिहारी बांधवाना त्यासाठी वेळ दिला पाहिजे. अमरनाथ यात्रा सुरू झाली असून कुठल्याही दुर्घटनेशिवाय पूर्ण व्हावी. ही यात्रा निर्विघ्न पार पडावी अशी भावना, त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत. युवकांना महाराष्ट्र सरकार रोजगार देवू शकत नाही, लाडक्या बहिण योजनेचा बट्याबोळ झाला आहे. मात्र महाराष्ट्र सरकार व त्यांचे नेते एका विशिष्ट समुदायाविरूद्ध बोलून दिशाभुल करत आहेत, असा आरोप असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जिंदाल कंपनीने दाखवलेल्या 19 वर्षांपूर्वीचा ना-हरकत दाखला बोगस, प्रहार जनशक्ती पक्षाच्या आरोपाने खळबळ जिंदाल कंपनीने दाखवलेल्या 19 वर्षांपूर्वीचा ना-हरकत दाखला बोगस, प्रहार जनशक्ती पक्षाच्या आरोपाने खळबळ
नांदिवडे गावचे ग्रामस्थ जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनल विरोधात अनेक दिवस लढा देत आहेत. गेल्या महिन्यात जयगड येथे झालेल्या बैठकीत जिंदाल...
दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या विमानाच्या इंजिनात बिघाड, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
Dhule News – कर्ज व्याज परताव्यासाठी लाचेची मागणी, जिल्हा समन्वयकाला अटक
खासदार संजय राऊत यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेतील घोटाळा उघड करत दिला दणका; पालकमंत्री विखेंच्या कार्यालयाला आली जाग
IND Vs ENG 3rd Test – सामना जिंकूनही इंग्लंडला ICC ने ठोठावला दंड, WTC गुणतालिकेतही बसला फटका
मी पुन्हा येईन! समारोपाचे अंबादास दानवे यांचे जोरदार भाषण
Nanded News – जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी राजीनामा द्यावा, पहलगाम हल्ल्यावरून ओवेसी यांची मागणी