बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसीमध्ये समाविष्ट करा, होमिओपॅथी डॉक्टरांचे उपोषण सुरू

बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसीमध्ये समाविष्ट करा, होमिओपॅथी डॉक्टरांचे उपोषण सुरू

होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी या मागणीसाठी राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी आजपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले. तत्पूर्वी, राज्यभरातून आलेल्या डॉक्टरांनी जोरदार निदर्शने करत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

राज्यातील अनेक मोठय़ा रुग्णालयांमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी व अतिदक्षता विभागामध्ये आयुष डॉक्टरांकडून सेवा पुरवली जाते. ही सेवा घेताना इंडियन मेडिकल असोसिएशनने कधीही आक्षेप घेतला नाही. मात्र होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला त्यांनी विरोध दर्शवला आहे. त्याविरोधात हे उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात मोठय़ा संख्येने डॉक्टर सहभागी झाले आहेत.

पावसाची पर्वा न करता शेकडो डॉक्टर आज आझाद मैदानात जमले. आंदोलनकर्त्या डॉक्टरांच्या हातात फलक होते. आरोग्य सेवेतील राजकारण बंद करा… बीएचएमएस डॉक्टरांना एमएमसीमध्ये समाविष्ट करा… गावोगावी सेवा आमची तरीही उपेक्षा का आमची… असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही… ‘आम्ही रस्त्यावर हक्कासाठी, सरकार फक्त मतासाठी’ असे फलक घेऊन डॉक्टर रस्त्यावर उतरले होते. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा इशारा होमिओपॅथी परिषदेने दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकुळ, महाराष्ट्र 20 टक्के कमिशनचे राज्य झाले आहे – विजय वडेट्टीवार राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकुळ, महाराष्ट्र 20 टक्के कमिशनचे राज्य झाले आहे – विजय वडेट्टीवार
पुण्यात कोयत्या गँगने धुमाकुळ घातला होता, पण दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची टॉवेल बनियन गँग आता कार्यरत झाली आहे. त्यांच्या मनासारखे नाही झाले...
सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप
विधानभवनाच्या लॉबीत राडा, गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; मलाच मारण्यासाठी आले होते, आव्हाडांचा आरोप
Ratnagiri News – एसटी आणि मिनी बसचा भीषण अपघात, 34 प्रवासी जखमी
‘या’ लक्षणांवरून ओळखा आतड्यांचे आरोग्य बिघडलं, सुधारण्यासाठी करा हे उपाय
Video – ही जर का परिस्थिती राज्याची आली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय?
ही जर का परिस्थिती राज्याची आली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय? विधिमंडळातील राड्यावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला घेरले