बेपर्वाईने गाडी चालवल्यास ‘नो इन्श्युरन्स’! सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

बेपर्वाईने गाडी चालवल्यास ‘नो इन्श्युरन्स’! सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

बेपर्वाईने गाडी चालवणाऱ्यांना किंवा स्वतःच्या चुकीमुळे जीव गमावणाऱ्यांना विमा कंपनी भरपाई देण्यास बांधील नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. रस्ते अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला. कुटुंबीयांची 80 लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. एन. एस. रवीश हे त्यांचे वडील, बहीण आणि मुले यांच्यासह कारने प्रवास करत असताना कर्नाटकातील मालनहल्लीजवळ त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्या वेळी रवीश वेगाने गाडी चालवत होते. त्यानंतर रवीश यांची पत्नी, मुलगा आणि पालकांनी विमा कंपनीकडे 80 लाख रुपयांची भरपाईची मागणी केली. पोलिसांनी आरोपपत्रात रवीश हे बेपर्वाईने गाडी चालवत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे नमूद केले.

l मोटार अपघात न्यायाधिकरणाने रवीश यांच्या कुटुंबाचा दावा फेटाळून लावला. नंतर त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आणि दावा केला की, हा अपघात टायर फुटल्यामुळे झाला. हा अपघात वेगवान आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे झाला व त्यानेच स्वतःचे नुकसान केले. त्यामुळे मृताचे कुटुंबीय विमा कंपन्यांकडे भरपाईचा दावा करू शकत नाहीत.’

कुटुंबीयांना दिलासा देण्यास नकार

सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. न्यायाधीश पीएस नरसिंह आणि आर महादेवन यांच्यासमोर याचिकेवर सुनावणी झाली. खंडपीठाने मृताच्या कुटुंबाला दिलासा दिला नाही. खंडपीठाने म्हटले की, स्वतःच्या चुकीमुळे अपघात होतो तेव्हा मृताचे कुटुंबीय भरपाई मागू शकत नाहीत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;