मराठी संतावर पहिला पाश्चात्त्य चित्रपट; संत सावता माळी यांच्या जीवनावरील चित्रपट येणार भेटीला

मराठी संतावर पहिला पाश्चात्त्य चित्रपट; संत सावता माळी यांच्या जीवनावरील चित्रपट येणार भेटीला

युरोपमधील चित्रपट स्टुडिओने संत सावता माळी यांच्यावरील पहिला पाश्चात्त्य चित्रपट महाराष्ट्रात चित्रीत केला. हा महाराष्ट्रातील संत परंपरेवरील अनेक नियोजित चित्रपटांपैकी पहिला चित्रपट आहे. वर्षाअखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आत्मारामा स्टुडिओ निर्मित हा प्रकल्प गोविंददास (इगोर मिहाज्लोविक, क्रोएशिया) आणि अचला (सिल्विया मिहाज्लोविक, पोलंड) या जोडप्याने त्यांच्या सद्‌गुरू परमहंस विश्वानंद यांच्या प्रेरणेने मराठी संतांच्या कथा साकारण्यासाठी केला आहे.

विठ्ठलाची आस, हा चित्रपट पहिल्यांदाच चित्रपटात काम करणाऱ्या स्थानिक कलाकारांसोबत शूट करण्यात आला आहे. या चित्रपटात संत सावता माळी यांच्या वंशजांनी काम केले आहे. हा चित्रपट सावता माळी यांनी काम केलेल्या शेतामध्ये चित्रीत करण्यात आला आहे. यात अरण, रोपळे, बोराळे या गावातील नवोदित कलाकारांनी अभिनय केला आहे, तर संत सावता माळी यांच्या 17 व्या व 18 व्या पिढीतील वंशज देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची वारकरी, भाविकांना उत्सुकता लागली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – रत्नदुर्ग किल्ल्यावरून उडी घेत जीवन संपवणाऱ्या तरुणीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल Ratnagiri News – रत्नदुर्ग किल्ल्यावरून उडी घेत जीवन संपवणाऱ्या तरुणीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल
प्रेमप्रकरणातून रत्नदुर्ग किल्ल्यावरून उडी घेणाऱ्या तरुणीच्या प्रियकराविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जसस्मिक केहर सिंग असे प्रियकराचे नाव आहे....
Ratnagiri News – माता ना तू वैरीणी… निष्ठुरतेचा कळस; पैशांसाठी जन्मदातीने मुलाचा केला सौदा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कमिटी का बसवता? याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करा; नाना पटोले यांची मागणी
महायुती सरकारच्या काळात 2 हजार 866 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं, अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात आक्रमक
Beed News – क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी, डॉ. सुदाम मुंडेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
Beed News – विकास निसर्गाच्या मुळावर; बीड-परळी रस्ता रूंदीकरणासाठी तीन हजार झाडांची कत्तल
चयापचयची प्रक्रिया मंद किंवा जास्त झाल्यावर शरीरावर कोणते परिणाम होतात? जाणून घ्या तज्ज्ञांकडून