शक्तिपीठ महामार्गातून नेमकी कुणाला ‘शक्ती’ मिळतेय? कैलास पाटील यांचा सवाल
राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. शक्तिपीठ महामार्गाची काहीच गरज नाही, त्यातून नेमकी कुणाला ‘शक्ती’ मिळतेय? असा सवाल शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी आज विधानसभेत केला.
शेतकरी आत्महत्या करताहेत, तरी सरकार त्या रोखण्यासाठी प्रयत्न करत नाही. व्यापाऱ्यांना जीएसटी माफ केला जातो, पण शेतकऱ्यांना नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन सरकारने अद्याप पूर्ण केलेले नाही. असे सांगतानाच, शक्तिपीठ महामार्ग नेमका कुणाला हवाय? असा सवाल कैलास पाटील यांनी सभागृहात विचारला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List