Chhatrapati Sambhajinagar Accident – डोळ्याचे पाते लवत नाही तोच भरधाव कारने 6 जणांना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar Accident – डोळ्याचे पाते लवत नाही तोच भरधाव कारने 6 जणांना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू

छत्रपती संभाजीनगर येथे भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव कारने शहरातील काळा गणपती मंदिराजवळ पाच ते सहा जणांना उडवले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे अंगावर काटा येणारे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

शुक्रवारी सकाळी सिडको परिसरातील काळा गणपती मंदिरासमोर भरधाव कारने दर्शनासाठी येणाऱ्या पाच ते सहा नागरिकांना उडवले. सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. कार अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

नेमके काय घडले?

काळा गणपती मंदिराजवळ झालेल्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात स्पष्ट दिसतेय की, सकाळी वेळ असल्याने ज्येष्ठ लोक नेहमीप्रमाणे मंदिरात दर्शनाला येत होते. काही अघटीत घडेल अशी कल्पनाही कुणाला नव्हती. इतक्यात एक भरधाव कार येते आणि पापणी लवत नाही तोच रस्त्यावर उभ्या पाच ते सहा जणांना अक्षरश: चेंडूसारखे उडवते. यानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला दिसतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – रत्नदुर्ग किल्ल्यावरून उडी घेत जीवन संपवणाऱ्या तरुणीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल Ratnagiri News – रत्नदुर्ग किल्ल्यावरून उडी घेत जीवन संपवणाऱ्या तरुणीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल
प्रेमप्रकरणातून रत्नदुर्ग किल्ल्यावरून उडी घेणाऱ्या तरुणीच्या प्रियकराविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जसस्मिक केहर सिंग असे प्रियकराचे नाव आहे....
Ratnagiri News – माता ना तू वैरीणी… निष्ठुरतेचा कळस; पैशांसाठी जन्मदातीने मुलाचा केला सौदा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कमिटी का बसवता? याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करा; नाना पटोले यांची मागणी
महायुती सरकारच्या काळात 2 हजार 866 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं, अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात आक्रमक
Beed News – क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी, डॉ. सुदाम मुंडेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
Beed News – विकास निसर्गाच्या मुळावर; बीड-परळी रस्ता रूंदीकरणासाठी तीन हजार झाडांची कत्तल
चयापचयची प्रक्रिया मंद किंवा जास्त झाल्यावर शरीरावर कोणते परिणाम होतात? जाणून घ्या तज्ज्ञांकडून