टेरर फंडिंगशिवाय अशा घटना घडू शकत नाहीत, पहलगाम हल्ल्यावर FATF ने पाकिस्तानला फटकारले

टेरर फंडिंगशिवाय अशा घटना घडू शकत नाहीत, पहलगाम हल्ल्यावर FATF ने पाकिस्तानला फटकारले

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादी अर्थपुरवठ्यावर नजर ठेवणारी संस्था फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) कठोर शब्दांत निंदा केली आहे. या हल्ल्यामागे दहशतवाद्यांना मिळणारे आर्थिक पाठबळ हा प्रमुख मुद्दा असल्याचे एफएटीएफने स्पष्ट केले आहे. संस्थेने म्हटले आहे की, असे क्रूर हल्ले दहशतवादी नेटवर्कमधील टेरर फंडिंगशिवाय शक्य होऊ शकत नाहीत.

‘दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ बंद करा’

एफएटीएफने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पहलगाम हल्ल्यासारख्या घटनांमागे एक सुसंघटित आणि खोलवर रुजलेले आर्थिक नेटवर्क कार्यरत आहे, जे जगभरात दहशतवादाचा प्रसार करण्यासाठी पैशांचा वापर करते. जोपर्यंत दहशतवादाला आर्थिक पुरवठा होत राहील, तोपर्यंत दहशतवादी कारवाया थांबणार नाहीत,” असे एफएटीएफने सांगितले.

या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी दहशतवादी अर्थपुरवठा रोखण्याच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे संस्थेने म्हटले आहे. एफएटीएफच्या अध्यक्षा एलिसा दे अंदा माद्राजो म्हणाल्या आहेत की, “दहशतवाद्यांना फक्त एकदा यशस्वी होण्याची गरज असते, पण आपल्याला प्रत्येक वेळी त्यांना रोखण्यासाठी यशस्वी व्हावे लागते.” त्यांनी दहशतवादी अर्थपुरवठ्याचा सामना करण्यासाठी जागतिक समुदायाला एकत्र येण्याचे आवाहन केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai News : अंधेरीत मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून कामगाराचा मृत्यू, इमारतीचे बांधकाम सुरू असताना घडली घटना Mumbai News : अंधेरीत मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून कामगाराचा मृत्यू, इमारतीचे बांधकाम सुरू असताना घडली घटना
इमारतीचे बांधकाम सुरू असताना माती खचल्याने ढिगाऱ्याखाली दबून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना अंधेरीत सोमवारी घडली. सोनेलाल प्रसाद असे मयत...
मधुमेह होण्यापूर्वी बहुतेक रुग्णांमध्ये ही तीन लक्षणे दिसतातच
‘रेडी टू ईट फूड’ खाणे चांगले आहे की धोकादायक? यात मिसळल्या जाणाऱ्या या गोष्टीमुळे त्रास होऊ शकतो का?
वासिंद ते आसनगावदरम्यान मालगाडीत तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक तासभर ठप्प
Beed News – ‘तुझा संतोष देशमुख करतो’ म्हणत तरुणावर कोयत्याने वार, शेतीतील बांधाच्या वादातून बीडमध्ये धक्कादायक प्रकार
इस्रायलने इराणच्या सरकारी मीडिया कार्यालयावर केला हल्ला, लाईव्ह शो सोडून अँकरला काढावा लागला पळ
कलिंगडाच्या बियांमध्ये दडला आहे खजिना! पण नेमक्या कशा पद्धतीने खाव्यात ? जाणून घ्या