दिल्लीहून रांचीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड
दिल्लीहून रांचीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे हवेतूनच विमान दिल्लीला माघारी वळवण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. विमानतळ अधिकाऱ्यांनी घटनेची पुष्टी केली. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.
एअर इंडियाचे एआय 9695 या विमानाने सोमवारी सायंकाळी 4.25 वाजता दिल्ली विमानतळाहून रांचीकडे उड्डाण घेतले. हे विमान सायंकाळी 6.20 वाजता रांचीतील बिरसा मुंडा विमानतळावर पोहचणे अपेक्षित होते. मात्र हवेतच या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते दिल्ली माघारी वळवण्यात आले.
विमानात नेमका कोणता बिघाड झाला, हे अद्याप समजू शकले नाही. एअर इंडियाने अद्याप या घटनेबाबत औपचारिक निवेदन जारी केलेले नाही. विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. प्रवाशांना कोणतीही दुखापत किंवा त्रास झाल्याचे वृत्त नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List