वासिंद ते आसनगावदरम्यान मालगाडीत तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक तासभर ठप्प
वासिंद ते आसनगावदरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सोमवारी रात्री रेल्वे वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे ऐन पावसात हाल झाले. रेल्वेच्या कर्मचार्यांनी तब्बल एक तासाने कसार्याहून दुसरे इंजिन मागवले. नंतर मालगाडी आसनगावच्या दिशेने रवाना झाली.
इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मालगाडी वासिंद ते आसनगाव दरम्यान डाऊन मार्गावर थांबली. यामुळे कसाराकडे जाणार्या लोकलसह मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेससह लांबपल्याच्या अनेक गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List