Ratnagiri News – गॅस टर्मिनलचे काम बंद पाडले, मनमानी करणाऱ्या जिंदाल कंपनीला ग्रामस्थांचा दणका

Ratnagiri News – गॅस टर्मिनलचे काम बंद पाडले, मनमानी करणाऱ्या जिंदाल कंपनीला ग्रामस्थांचा दणका

रत्नागिरीतील नांदिवडे येथील गॅस टर्मिनलला परवानगी नसल्याचे सांगून मेरीटाईम बोर्डाने जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनलचे काम थांबवले होते. पण त्यानंतर जिंदाल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आज पुन्हा गॅस टर्मिनलचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. शासनाचा आदेश मोडून गॅस टर्मिनलचे सुरू केलेले काम ग्रामस्थांनी आज बंद पाडले. कंपनीच्या या दादागिरी विरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

प्रशासनाच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता लावणाऱ्या जिंदाल कंपनीवर राज्य सरकार काय कारवाई करणार? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने गॅस टर्मिनसचे काम तात्काळ थांबवले आहे. तरी देखील आज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काम सुरू करण्याचा प्रयत्न केला.

स्थानिक लोकांचा विरोध असताना देखील शासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी न घेता जिंदाल कंपनी मनमानी करून नांदिवडे गावातील लोकवस्तीमध्ये गॅस टर्मिनल उभारत आहे. आधीच जिंदाल कंपनीच्या कोळशाची धूळ आणि राख याचा स्थानिकांना खूप त्रास होत आहे. आज नांदिवडे आणि जयगड परिसरामध्ये त्वचेचे आजार असलेले रुग्ण, श्वसनाचे आजार असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात होत आहेत. एवढा त्रास होत असताना देखील कंपनी गावामध्ये गॅस टर्मिनल उभारत आहे, असा संताप माजी सरपंच गुरू सुर्वे यांनी व्यक्त केला. शासनाने या सर्व गोष्टींची दखल घेत लवकरात लवकर गॅस टर्मिनल लोकवस्तीतून स्थलांतरी करावे. आणि जिंदाल कंपनीवर कारवाई करावी, अशी शेतकरी आणि मच्छीमारांची मागणी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई – गोवा महामार्गावरील घाट प्रवास बिकट मुंबई – गोवा महामार्गावरील घाट प्रवास बिकट
मुंबई–गोवा महामार्गावरील अवघड वळणे जीवघेणी ठरत आहेत. महामार्गाचे अर्धवटस्थितीत काम आणि ठिकठिकाणी असलेले पर्यायी रस्ते पावसाळ्य़ात अधिक धोकादायक ठरत आहेत....
फडणवीस-राज ठाकरे भेट… मिंधेंना टेन्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीला आव्हान, 16 जूनपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करा; हायकोर्टाचे याचिकाकर्त्यांना आदेश
मतचोरीबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची सारवासारव, कायद्यांनुसार मतदारांची नावे समाविष्ट किंवा वगळण्याची तरतूद नाही
अखेर कामाठीपुराचा पुनर्विकास मार्गी लागणार, 8 हजार रहिवाशांना मिळणार हक्काचे घर; कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी नेमण्यासाठी म्हाडातर्फे निविदा प्रसिद्ध 
प्रकल्पग्रस्तांसाठी आता मुलुंडमध्ये 6731 घरे, पालिकेचे प्रकल्प मार्गी लागणार
वरळी, नायगाव बीडीडीवासीयांना सप्टेंबरमध्ये मिळणार नव्या घरांच्या चाव्या; ना. म. जोशी मार्गावरील रहिवाशांना डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा