‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाला देशभरातून वाचकांचा जबरदस्त प्रतिसाद, अवघ्या 7 दिवसांत 10 हजार प्रतींची विक्री

‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाला देशभरातून वाचकांचा जबरदस्त प्रतिसाद, अवघ्या 7 दिवसांत 10 हजार प्रतींची विक्री

भाजपच्या सुडाच्या राजकारणातून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊत यांना 100 दिवस आर्थर रोड कारागृहात काढावे लागले. त्या अनुभवांचं थरारक चित्रण असलेलं ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक संजय राऊत यांच्या लेखणीतून साकारलं असून प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात 17 मे राजी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं. नरकातला स्वर्ग या पुस्तकाला देशभरातून वाचकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या 7 दिवसांत या पुस्तकाच्या 10 हजार प्रतींची विक्री झाली आहे.

नरकातला स्वर्ग या पुस्तकाला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादासाठी संजय राऊत यांनी वाचकांचे आभार मानले आहेत. X वर एक पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, “नरकातला स्वर्ग, वाचकांचा जबरदस्त प्रतिसाद. मराठी माणसा, त्रिवार धन्यवाद! जय महाराष्ट्र!” दरम्यान, नरकातला स्वर्ग हे पुस्तक घरपोच ऑर्डर करण्यासाठी वाचक 8010924951 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करू शकतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डिजिटल अरेस्टची भीती घालून अमेरिकन नागरिकांची पुण्यातून लाखोंची लूट; आरोपी गुजरात, राजस्थानचे डिजिटल अरेस्टची भीती घालून अमेरिकन नागरिकांची पुण्यातून लाखोंची लूट; आरोपी गुजरात, राजस्थानचे
‘डिजिटल अरेस्ट’ची भीती घालून अमेरिकेतील नागरिकांकडून दररोज तब्बल 30 ते 40 हजार डॉलर्स उकळणाऱया खराडीतील बनावट कॉल सेंटरचा पुणे पोलिसांनी...
हगवणे कुटुंबीयांचे बँकेतील लॉकर सील, बाळाच्या हेळसांडप्रकरणी नीलेश चव्हाणवर गुन्हा
वीर जवान संदीप गायकर यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
अनुबंध – तो एक क्षण
पाणीसाठा अवघ्या 28 टक्क्यांवर; राज्यातल्या धरणांनी तळ गाठला, कोयना धरणात फक्त 19 टक्के, मुंबईचा पाणीसाठा 16 टक्क्यांवर
आरटीओने ताब्यात घेतलेली शेकडो वाहने धूळ खात, हायकोर्टाच्या आदेशानंतर ई-लिलाव प्रक्रियेला गती
किस्से आणि बरंच काही – प्रामाणिक अदाकारा