Ratnagiri News – रत्नागिरीत अंमली पदार्थ विकणारी साखळी तोडून टाकणार, पोलीस अधीक्षक नितीन बगाटेंचा कडक इशारा

Ratnagiri News – रत्नागिरीत अंमली पदार्थ विकणारी साखळी तोडून टाकणार, पोलीस अधीक्षक नितीन बगाटेंचा कडक इशारा

मी अतिशय संवेदनशील जिल्ह्यातून शांतता असलेल्या जिल्ह्यात आलो आहे. रत्नागिरी जिल्ह्यात असलेली शांतता भंग होऊ देणार नाही, अशा शब्दात रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपली भूमिका पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.

रत्नागिरीत अंमली पदार्थ विकणारी साखळी तोडून टाकणार, अशा कडक शब्दात त्यांनी ड्रग्जमाफियांना इशारा दिला आहे. नितीन बगाटे शनिवारी (24 मे 2025) छत्रपती संभाजीनगर येथून रत्नागिरीत दाखल झाले आणि त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “मी 2021 ते 2023 या काळात सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर काम केले आहे. मी रत्नागिरीतही दोन वेळा आलो आहे. त्यामुळे कोकण मला माहित आहे. मी यापूर्वी छत्रपती संभाजीनगर सारख्या जिल्ह्यात काम केले आहे. तिथून मी शांतता असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात आलो आहे. रत्नागिरीची शांतता भंग होणार नाही”, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

पोलिसांच्या फिटनेससंदर्भात बोलत असताना ते म्हणाले की, “पोलिसांनी फिट असले पाहिजे. येणाऱ्या तक्रारदाराशी व्यवस्थित संवाद साधला पाहिजे. कामात पारदर्शकता पाहिजे. एखाद्या घटनेनंतर तात्काळ प्रतिसाद देता आला पाहिजे. याकरिता मी प्रयत्नशील रहाणार आहे”, असे नितीन बगाटे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाला देशभरातून वाचकांचा जबरदस्त प्रतिसाद, अवघ्या 7 दिवसांत 10 हजार प्रतींची विक्री ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाला देशभरातून वाचकांचा जबरदस्त प्रतिसाद, अवघ्या 7 दिवसांत 10 हजार प्रतींची विक्री
भाजपच्या सुडाच्या राजकारणातून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊत यांना 100 दिवस आर्थर...
IPL 2025 – दिल्लीने शेवट गोड केला, पंजाबची दांडी केली गुल
फक्त ‘या’ दोन गोष्टींपासून बनवा होममेड काजळ, डोळ्यांना मिळतील फायदे
योग्य पत्ता न दिल्याने संतापला, झेप्टो डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल
कुठलीच कंपनी प्रसूती रजेचा लाभ नाकारू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Pahalgam Attack : ज्यांच्या कपाळाचं कुंकू हिसकावलं गेलं, त्या महिलांमध्ये योद्ध्याची भावना-उत्साह नव्हता; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
समुद्रात बुडत होते परदेशी जहाज, तटरक्षक दल देवदूतासारखे धावून आले; 9 जणांची सुटका, 15 जण अडकले