ग्राहक आयोगाचा सरकारी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना झटका; शेतकऱ्याला दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश

ग्राहक आयोगाचा सरकारी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना झटका; शेतकऱ्याला दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश

विजेच्या तारांमुळे लागलेल्या आगीत बांबू शेतीचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत ग्राहक आयोगाने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीबुशन कंपनीच्या (एमएसइडीसीएल) चार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. या शेतकऱ्याला दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश आयोगाने या चार कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

कंपनीचे तीन वरिष्ठ अभियंते व विभागीय आयुक्तांनी नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्याला द्यावी, असे नागपूर येथील अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आदेशात नमूद केले आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विजेच्या तारांची नीट देखभाल केली नाही. त्यांनी त्यांच्या कामात कसूर केला आहे, असेही आयोगाने फटकारले.

काय आहे प्रकरण
68 वर्षीय शेतकऱ्याने आयोगाकडे ही तक्रार केली होती. त्यांनी बांबूची पाच हजार झाडे लावली. 22 मार्च 2018 रोजी विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट झाले व आग लागली. या आगीत शेतीचे नुकसान झाले. कंपनीने विजेच्या तारांची दुरुस्ती केली. आगीचा पंचनामा झाला. वन विभागाने 10.27 लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल दिला. त्याची प्रत कंपनीला दिली. कंपनीकडून केवळ 4.2 लाखांची नुकसानभरपाई देण्यात आली. त्याविरोधात शेतकऱ्याने आयोगाचे दार ठोठावले. वन विभागाच्या अहवालानुसार नुकसानभरपाई द्यावी.

नऊ टक्के व्याजाने पैसे द्या
23 मे 2018 पासून नऊ टक्के व्याजाने नुकसानभरपाईची रक्कम 45 दिवसांत शेतकऱ्याला द्यावी, तसेच शेतकऱ्याला झालेल्या मानसिक त्रासासाठी 40 हजार रुपये व तक्रार करण्यासाठी आलेल्या खर्चाचे दहा हजार रुपये द्यावेत, असेही आयोगाने कर्मचाऱ्यांना सांगितले आहे.

कंपनीचा दावा
नुकसानभरपाईचा काही वाद असेल तर शेतकऱ्याने इलेक्ट्रिसिटी कायद्यांतर्गत तक्रार करायला हवी, असा दावा कंपनीने केला. तो आयोगाने मान्य केला नाही

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खरंच प्रेग्नंसीमध्ये रोज तूप खाल्लं तर होते नॉर्मल डिलिव्हरी? पाहुया डॉक्टर काय सांगतात? खरंच प्रेग्नंसीमध्ये रोज तूप खाल्लं तर होते नॉर्मल डिलिव्हरी? पाहुया डॉक्टर काय सांगतात?
भारतात गर्भवती महिलांना सर्व बाजूंनी सल्ला मिळतो. प्रत्येकजण त्यांच्या अनुभवाच्या आधारे या महिलांना सल्ले दिले जातात. भारतात सामान्य प्रसूतीबद्दल अनेक...
Team India च्या वेळापत्रकात BCCI ने केला मोठा बदल, वाचा…
जंगली गवताच्या झाडूला ग्रामीण भागात मोठी मागणी, वाघाची दहशत असतानाही महिला करतात तोडणी
प्रेमसंबंध ठेवण्यास दिला नकार, प्रियकराने OYO हॉटेलमध्ये चाकूने 17 वेळा केले वार; दोन मुलांच्या आईचा मृत्यू
मंदिरात उत्सवादरम्यान मानवी अवशेषांसह डान्स, व्हिडिओ व्हायरल होताच पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
Chandrapur News निर्मानाधिन राष्ट्रीय महामार्ग ठरतोय जीवघेणा, दुचाकी अपघातात माय लेकीचा करुण अंत
Gondia News – पिंडदान करताना तोल जाऊन महिला नदीत कोसळली, वाचवायला गेलेल्या दोघींसह तीन जणी बुडाल्या