ग्राहक आयोगाचा सरकारी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना झटका; शेतकऱ्याला दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश

ग्राहक आयोगाचा सरकारी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना झटका; शेतकऱ्याला दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश

विजेच्या तारांमुळे लागलेल्या आगीत बांबू शेतीचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत ग्राहक आयोगाने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीबुशन कंपनीच्या (एमएसइडीसीएल) चार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. या शेतकऱ्याला दहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश आयोगाने या चार कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

कंपनीचे तीन वरिष्ठ अभियंते व विभागीय आयुक्तांनी नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्याला द्यावी, असे नागपूर येथील अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने आदेशात नमूद केले आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विजेच्या तारांची नीट देखभाल केली नाही. त्यांनी त्यांच्या कामात कसूर केला आहे, असेही आयोगाने फटकारले.

काय आहे प्रकरण
68 वर्षीय शेतकऱ्याने आयोगाकडे ही तक्रार केली होती. त्यांनी बांबूची पाच हजार झाडे लावली. 22 मार्च 2018 रोजी विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट झाले व आग लागली. या आगीत शेतीचे नुकसान झाले. कंपनीने विजेच्या तारांची दुरुस्ती केली. आगीचा पंचनामा झाला. वन विभागाने 10.27 लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल दिला. त्याची प्रत कंपनीला दिली. कंपनीकडून केवळ 4.2 लाखांची नुकसानभरपाई देण्यात आली. त्याविरोधात शेतकऱ्याने आयोगाचे दार ठोठावले. वन विभागाच्या अहवालानुसार नुकसानभरपाई द्यावी.

नऊ टक्के व्याजाने पैसे द्या
23 मे 2018 पासून नऊ टक्के व्याजाने नुकसानभरपाईची रक्कम 45 दिवसांत शेतकऱ्याला द्यावी, तसेच शेतकऱ्याला झालेल्या मानसिक त्रासासाठी 40 हजार रुपये व तक्रार करण्यासाठी आलेल्या खर्चाचे दहा हजार रुपये द्यावेत, असेही आयोगाने कर्मचाऱ्यांना सांगितले आहे.

कंपनीचा दावा
नुकसानभरपाईचा काही वाद असेल तर शेतकऱ्याने इलेक्ट्रिसिटी कायद्यांतर्गत तक्रार करायला हवी, असा दावा कंपनीने केला. तो आयोगाने मान्य केला नाही

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;