शाहरुख खानचा ‘हा’ चित्रपट सत्य घटनेवर आधारित; पण त्याने अद्यापर्यंत पाहिला नाही, म्हणाला “ती भावना मला नको होती…”

शाहरुख खानचा ‘हा’ चित्रपट सत्य घटनेवर आधारित; पण त्याने अद्यापर्यंत पाहिला नाही, म्हणाला “ती भावना मला नको होती…”

बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे सत्य घटेनवर आधारित आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचंही नाव आहे. शाहरूखचा एक चित्रपट असा आहे जो सत्य घटनेवर आधारीत असून तो प्रचंड गाजला. पण तरीही त्याने त्याचा हा चित्रपट अद्यापपर्यंत पाहिला नाहीये. तसे तर शाहरुख खान त्याचे स्वतःचे चित्रपट अनेक वेळा पाहतो जेणेकरून तो त्यातील त्रुटी ओळखू शकेल आणि भविष्यासाठी सुधारणा करू शकेल. पण त्याचा हा चित्रपट त्याने आजपर्यंत पाहिलेला नाही. यामागील कारणही त्याने सांगितलं आहे. हा चित्रपट म्हणजे 2004 मध्ये प्रदर्शित झालेला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेश’. या चित्रपटाने लोकांना खूप प्रेरणा दिली.

हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित

‘स्वदेश’ ची कथा पूर्णपणे काल्पनिक नव्हती हे फार कमी लोकांना माहिती आहे. हा चित्रपट मुख्यत्वे रविकुचिमांची आणि अरविंद नावाच्या जोडप्याच्या जीवनावर आधारित होता, जे परदेशातून भारतात परतले आणि प्रत्यक्षात महाराष्ट्रातील बैलगाव नावाच्या गावाला वीज पुरवू शकणारे एक छोटे धरण बांधले. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असला तरी, आशुतोष गोवारीकर यांना तो बनवण्याची प्रेरणा ‘बापू कुटी’ नावाच्या पुस्तकातून मिळाली. विशेष म्हणजे, हे पुस्तक चित्रपटातही दाखवण्यात आले आहे.

चित्रपटात हे पुस्तक कुठे दाखवण्यात आलं आहे?

चित्रपटात एक दृश्य आहे जिथे शाहरुख खान काउंटरजवळ उभा आहे आणि अभिनेत्री गायत्री जोशीची वाट पाहताना दिसत आहे. हे पुस्तक एका पुस्तकांच्या दुकानात चित्रित केलेल्या दृश्यात बिलिंग बुक्सजवळ ठेवण्यात आलेले दिसते. एवढंच नाही तर मोहन भार्गव ज्या पावसाचा शोध घेणारा सॅटेलाईट (ग्लोबल प्रेसिपिटेशन मेजरमेंट – GMP) वर काम करत असल्याचं दाखवलं गेलं आहे ते नासाचे खरे जीएमपी मिशन होते जे 2014 मध्ये लाँच केले गेले होते. या चित्रपटातील प्रत्येक सीन हा प्रेक्षकांच्या मनाला भावणारा आहे. पण असं असूनही शाहरुख खानने हा चित्रपट कधीच का पाहिला नाही?

शाहरुखने हा चित्रपट का पाहिला नाही?

शाहरुख खानने इतका उत्तम चित्रपट न पाहण्याचे कारण तांत्रिक नसून भावनिक आहे. खरंतर, शाहरुख खान या चित्रपटात आणि या पात्रात इतका गुंतला होता की त्याला या चित्रपटाचा शेवट पहायचा नव्हता. शाहरुख खान स्वतः म्हणाला होता “स्वदेश बनवणे हा इतका भावनिक आणि समाधानकारक अनुभव होता की तो बनवल्यानंतर मी तो चित्रपट कधीच पाहिला नाही. चित्रपटाच्या समाप्तीची भावना मला नको होती.” हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला आणि आजही आहे. केवळ चित्रपट नाही तर त्यातील गाणे देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संध्याकाळी या 5 गोष्टी करा, मग पहा तुमचे आयुष्य कसे बदलते संध्याकाळी या 5 गोष्टी करा, मग पहा तुमचे आयुष्य कसे बदलते
प्रत्येकाला एक अद्भुत, आनंदी आणि आरामदायी जीवन हवे असते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण दिवसभर कठोर परिश्रम करतो. परंतु...
अकोल्यात डीपीडीसीच्या बैठकीत शिवसेनेचा दणका, 29 कोटींचा निधी परत पाठवल्याने शिवसैनिक आक्रमक
Kolhapur Crime लग्नास नकार दिल्याने लिव्ह-इन-रिलेशनशिपमधील तरुणीची हत्या, बॉयफ्रेंडनेही संपवले जीवन
हिंदुस्थान-पाकिस्तानमधील युद्धबंदी ट्रम्पमुळेच, रशियाचाही दुजोरा! पंतप्रधान मोदी स्पष्टीकरण देणार का? काँग्रेसचा सवाल
करीना कपूरचे आवडते योगासन माहितीये का? मिळतात आश्चर्यकारक फायदे
आयुर्वेदानुसार मधुमेहावर मात करण्याच्या सोप्या परिणामकारक पद्धती
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात मोठी कारवाई! आरसीबी, आयोजक, कर्नाटक क्रिकेट असोसिएशन यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल